शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे कल्याणमधील प्रवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 15:15 IST

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रिक्षा चालकांकडून प्रवासी भाडे नाकारणे, मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारणे, प्रवाशांसोबत उद्धट वर्तन ...

कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका क्षेत्रातील रिक्षा चालकांकडून प्रवासी भाडे नाकारणे, मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारणे, प्रवाशांसोबत उद्धट वर्तन अशा तक्रारी वाढत असल्याने प्रवासी अक्षरश: हैराण झाले आहेत.

रिक्षांची अमाप संख्या, वाहतूक यंत्रणावर वाढलेला ताण, हतबल आरटीओ व वाहतूक पोलीस, असे चित्र प्रवाशांना अनुभवास येत आहे. आरटीओची रिक्षा प्रवासी तक्रार हेल्पलाइन बंद आहे. मध्यंतरी कल्याण आरटीओने रिक्षा प्रवासी हेल्पलाइन म्हणून एक व्हॉट्सॲप नंबर जारी केला; पंरतु हा हेल्पलाइन क्रमांक परिणामकारक नाही. यामुळे रिक्षा प्रवाशांनी तक्रार कुठे करायची, असा सवाल ते करीत आहेत. शासनाने रिक्षा परवाने विनाशर्त खुले केल्यामुळे रिक्षाचालकांमध्ये अपप्रवृत्ती बोकाळली असून विना लायसन्स, बॅच अल्पवयीन रिक्षा चालकांचे प्रमाण या व्यवसायात वाढले आहे.

मुंबई शहरात वाहतूक पोलीस व आरटीओ यांची टॅक्सी प्रवासी तक्रार निवारण हेल्पलाइन उपलब्ध आहे. टॅक्सी प्रवाशांची तक्रार ताबडतोब घेऊन वाहतूक पोलीस व आरटीओ यांच्याकडून तक्रारीची खातरजमा करून टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाते. मुबंई शहरात हेल्पलाइनच्या जनजागृतीसाठी सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.

मुंबई वाहतूक पोलिसांच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाहतूक पोलीस व आरटीओ संयुक्तिक रिक्षा प्रवास तक्रार हेल्पलाइन सुरू करावी व हेल्पलाइन क्रमांक सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली