शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
2
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
3
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
4
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
5
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
6
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
7
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
8
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
9
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
10
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
11
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
12
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
13
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
14
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
15
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
16
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
17
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
18
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
19
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
20
सुवर्णसंधी! ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक अप्रेंटिस भरती, स्टायपेंड किती मिळणार? पाहा...

धोकादायक मुन्ना मौलवी इमारत खाली करण्यासाठी पोलिस बळाचा वापर करणार

By मुरलीधर भवार | Published: June 28, 2024 7:52 PM

कल्याण-कल्याण रेतीबंदर परिसरातील मौलवी कंपाऊंडनजीक असलेल्या मुन्ना मौलवी या धोकादायक इमारतीमधील नागरीकांनी आज पुन्हा महापालिका मुख्यालयात धाव घेतली. महापालिका ...

कल्याण-कल्याण रेतीबंदर परिसरातील मौलवी कंपाऊंडनजीक असलेल्या मुन्ना मौलवी या धोकादायक इमारतीमधील नागरीकांनी आज पुन्हा महापालिका मुख्यालयात धाव घेतली. महापालिका आम्हाला घरातून जबरदस्तीने बाहेर काढू शकत नाही. कारण आम्ही सामान्य लोक आहे. आम्हाला भाड्याने घर घेणे शक्य होणार नाही. नागरीकांचा घरे खाली करण्यास विरोध असला तरी महापालिा प्रशासनाकडून त्यांना काेणतेही आश्वासन दिले गेले नाही. उलट त्यांनी घरे खाली केली नाही तर पाेलिस बळाचा वापर करुन इमारत खाली केली जाईल असे स्पष्ट केले आहे.

मौलवी कंपाऊंडनजीक असलेल्या मुन्ना मौलवी ही तळ अधिकचार मजली इमारत धोकादायक आहे. ही इमारत धोकादायक असल्याने या इमारतीला महापालिका प्रशासनाकडून नोटिस बजावली जाते. घरे खाली करण्यासाठी बजावण्यात आलेली नोटिस या इमारतीच्या मालकीन शगुफ्ता मुनीर मौलवी यांनी नोटिस स्वीकारली नव्हती. २२ जून रोजी इमारतीच्या चौथ्या मजल्याचा सज्जा कोसळून एक महिला व तिची लहान मुलगी जखमी झाली होती. त्यानंतर महापालिकेने ही इमारत तातडीने खाली करण्याची प्रक्रिया सुरु केली. इमारत खाली केल्यावर भोगवटा प्रमाणपत्र दिले जाईल असे महापालिकेने सांगितले. ७५ कुटुंबियांपैकी काही जणांनी घरे खाली केली. त्यांना भोगवटा प्रमामपत्र दिले गेले नाही. त्यामुळे उर्वरीत नागरीकांनी घरे खाली केली नाही. आधी भोगवटा प्रमाणपत्र द्या मगच घरे खाली करणार असा पावित्रा घेतला. ज्या नागरीकांनी घरे खाली केली होती. ते सुद्धा पुन्हा त्याच इमारत राहण्यासाठी आले.

हापालिकेने इमारतीच्या मालकीण शगुफ्ता मुनीर मौलवी यांच्या विरोधात महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी मौलवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आज पुन्हा या इमारतीमधील नागरीकांनी का’ंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयुक्त जाखड यांची भेट घेतली. या इमारती राहणारे सर्व कुटुंबिय हे सामान्य आहे. ते भाडेकरु आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते भाड्याने त्या इमारतीत राहतात. त्याना अन्य ठिकाणी भाड्याने घर घेण्याची आर्थिक कुवत नाही. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन महापालिकेच्या बीएसयूपी प्रकल्पातील घरांमध्ये करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. या मागणीकरीता राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे त्यांना बीएसयूपीच्या घरात स्थलांतरीत करता येणार नाही. त्यांचे स्थलांतर महापालिकेच्या रात्र निवारा केंद्रात केले जाईल. त्यावर नागरीकांनी असा मुद्दा उपस्थित केला की, रात्र निवारा केंद्रात ७५ कुटुंबियांसाठी पुरेशी जागा आहे. महिला आणि पुरुष एकाच ठिकाणी कसे काय झोपू शकतात याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर प्रशासन निरुत्तर होते. नागरीकांनी घरे खाली केली नाही तर पोलिस बळाचा वापर करुन घरे खाली करण्यात येतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.