शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजप-मनसे युतीत बिब्बा घालण्याची सेनेची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 07:31 IST

कल्याण-डोंबिवलीत फाटाफूट : आक्रमक राजकारण

प्रशांत मानेडोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून या पक्षाच्या वाढीकरिता सुपीक प्रदेश राहिलेल्या कल्याण-डोंबिवलीत मनसेला खिळखिळे करण्याच्या दृष्टीने शिवसेनेने हालचाल सुरू केली आहे. पूजा गजानन पाटील व प्रकाश माने या माजी नगरसेवकांना शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश देण्यामागे हेच राजकारण आहे. निवडणुकीपूर्वी अथवा निकालानंतर भाजप व मनसे यांनी एकत्र येऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला आव्हान देऊ नये याकरिता सेनेने तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.वर्षभरापूर्वी राज ठाकरेंच्या जवळचे मानले गेलेले राजेश कदम आणि मंदार हळबे या दोन शिलेदारांसह शहरातील अन्य पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात अन्यत्र मनसेला यश लाभले नाही. परंतु कल्याण-डोंबिवली परिसरात मनसेचे राजू पाटील आमदार झाले. याच पाटील यांच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची गळती सुरू झाली.. माजी नगरसेविकेसह अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत केलेला प्रवेश हे ‘दबावाचे राजकारण’ असल्याचा आरोप पाटील यांच्याकडून होत असला तरी केडीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेले ‘फुटी’चे राजकारण मनसेच्या मुळावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.मनसेची स्थापन २००६ मध्ये झाली. स्थापनेपूर्वी छेडलेल्या आंदोलनाची पहिली ठिणगी कल्याण-डोंबिवलीत पडली आणि तिचा वणवा महाराष्ट्रात पसरला. यामुळे पक्षाला उभारी मिळाली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १३ आमदार निवडून आले. त्यामध्ये एक डोंबिवलीतील रमेश पाटील हेही होते. विधानसभा निवडणुकीत काही मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या राजेश कदम यांनादेखील भरघोस मते मिळाली. २०१० च्या केडीएमसी निवडणुकीत मनसेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. यातील १७ नगरसेवक डोंबिवलीचे होते. नगरसेवक आणि पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांची एकूणच कार्यशैली आपापसातील ‘दरी’ वाढण्यास कारणीभूत ठरली.शहरप्रमुख राजेश कदम यांना जिल्हाध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली, परंतु ती त्यांनी नाकारली. ही संधी २००९ मध्ये पक्षात नव्याने आलेल्या प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी उचलली. तेव्हापासून पक्षावर पाटलांची हुकुमत आहे. याची प्रचिती २०१५ च्या महापालिका निवडणुकीत पाहायला मिळाली. पाटील यांचे समर्थक मनोज घरत यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. परंतु त्याचवेळी मोदी लाटेमुळे मनसेची २७ नगरसेवकांवरून घसरगुंडी होऊन नऊ नगरसेवक विजयी झाले. मनसेने आता भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. यामुळे पुन्हा मनसेने बाळसे धरले व महापालिका निवडणुकीपूर्वी किंवा नंतर मनसे व भाजपची युती झाली तर सेनेची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे मनसे खिळखिळी करण्याचा प्रयत्न सेनेने सुरू केला आहे.

मनसेच्या एकमेव आमदारासमोर मोठे आव्हानप्रारंभीच्या काळात मनसेच्या पक्षबांधणीत अग्रणी असलेल्या अनेक सहकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली. राजेश कदम यांच्यासह मंदार हळबे, सागर जेधे, दीपक भोसले, इरफान शेख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे वर्षभरात पाहायला मिळाले. आता ग्रामीण भागातील माजी नगरसेविका पूजा पाटील, प्रकाश माने आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पक्षाशी फारकत घेतली. त्यामुळे मनसेचे एकुलते एक आमदार राजू पाटील यांच्यासमोरील आव्हान मोठे आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाMNSमनसेRaju Patilराजू पाटील