शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

बाहेरगावच्या लेट गाड्यांना प्राधान्य, लोकलचा खोळंबा; मध्य रेल्वेकडून देण्यात आली कबुली 

By अनिकेत घमंडी | Updated: August 16, 2024 07:10 IST

रेल्वेचे वेळापत्रक सांभाळणे ही तारेवरची कसरत, अनेक तांत्रिक अडचणींमुळे वेळापत्रक पाळले जात नाही

अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: देशभरातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या कसारा, कर्जतला येईस्तोवर आधीच त्यांना विलंब झालेला असतो. त्यामुळे त्या बाहेरगावच्या गाड्यांऐवजी लोकलला प्राधान्य दिले, तर दूरवरून आलेल्यांचा आणखी खोळंबा होईल. त्यामुळे लोकलपेक्षा बाहेरगावाहून येणाऱ्या गाड्यांना अगोदर पुढे जाण्याची संधी दिली जाते.

परिणामी, मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या लोकल दररोज उशिरा धावतात, अशी धक्कादायक कबुली मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीशकुमार गोयल यांनी दिली. रेल्वेचे वेळापत्रक सांभाळणे ही एक तारेवरची कसरत असून, अनेक तांत्रिक अडचणीमुळे वेळापत्रक पाळले जात नाही. त्याला आमचा नाइलाज आहे, असे आर्जवही गोयल यांनी रेल्वे प्रवासी संघटनेपुढे केले.

प्रशासनाचे रडगाणे

लोकल सेवा दररोज किमान १५ मिनिटे ते कमाल एक तास उशिरा सुरू असल्याच्या निषेधार्थ २२ ऑगस्ट रोजी प्रवासी संघटनांनी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. प्रवासी संघटनांनी हे आंदोलन करू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने बैठक आयोजित केली होती. मात्र, बैठकीत रेल्वे प्रशासनाने स्वतःचेच रडगाणे गायले. परिणामी, प्रवासी संघटनांचा पंचसूत्री कार्यक्रम कागदावरच राहिल्याची खंत दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड.आदेश भगत यांनी व्यक्त केली.

आंदोलनावर ठाम

बैठक ही उपनगरी लोकल प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठीहोती, पण ते सोडून रेल्वेने त्यांच्या तांत्रिक अडचणींचा पाढा वाचला. लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य द्यायचे तर द्या, पण लोकल प्रवासी हे सुमारे ४५ लाख आहेत, त्यांचा विचार प्राधान्याने करायला हवा, अशी प्रतिक्रिया ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली. बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नसल्याने २२ ऑगस्टला आंदोलन करण्यावर संघटना ठाम आहे.

रेल्वे प्रशासनाने एवढी वर्षे एकदाही संघटनांना बोलावले नाही; मात्र, आंदोलनाची हाक दिल्यावर बैठकीला बोलावले. याचा अर्थ त्यांना विरोध नकोय. पण, रेल्वेने समस्या सोडवायला हव्यात. ते सोडून स्वतःचे रडगाणे ऐकवून काय साध्य होणार? आम्हाला जादा लोकल फेऱ्या हव्यात, त्याचे काय करता ते सांगा.- मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्था (महासंघ)

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली