शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By मुरलीधर भवार | Updated: March 3, 2024 19:46 IST

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा माेठा वाटा असल्याने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कल्याण- आधीचे महाविकास आघाडीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे सरकार होते. मात्र आमचे सरकार हे सर्व सामन्यांचे अश्रू पुसणारे सरकार आहे अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. कल्याण शीळ राेड लगत असलेल्या कोळेगावातील प्रिमियम ग्राऊंडवर आज शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपरोक्त टिका केली.

या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री शंभराजे देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, भाजप आमदार किसन कथोरे, संजय केळकर, कुमार आयलानी, निरंजन डावखरे, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना आमदार रविंद्र फाटक आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की फेसबूक लाईव्ह करुन सरकार चालविता येते नाही. ग्राऊंडवर जाऊन काम करावे लागते. शेतकऱ्यांच्या शेतात साचलेला चिखल तुडवित पाहणी करावी लागते. घरात बसून ते काम होत नाही. आमचे सरकार लोकाभिमुख आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमातून सरकारमधील प्रत्येक अधिकारी कर्मचारी हा लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचला आहे. या आधीच्या सरकारमध्ये निर्णय घेण्याचे धाडस नव्हेत. एखाद्या प्रश्नावर आंदोलने होतात. 

तेव्हा त्यांना विश्वास द्यावा लागतो. दिलेला शब्द पाळावा लागतो. दिलेला शब्द पाळण्याचे आणि निर्णय घेण्याचे धाडस आमच्या सरकारने दाखविले आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्याला फायदा केंद्रात कोणताही पाठविलेला विकासाचा प्रस्ताव लगेच मंजूर होतो. त्याचा फायदा जनतेला व्हावा हाच आमच्या सरकारचा उद्देश आहे. कोणत्याही राजकीय नेत्याच्या वैयक्तीक फायद्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला नाही. सामान्य जनतेच्या फायद्यासाठी निर्णय घेतले आहेत. मागील सरकारच्या अहंकारी वृत्तीमुळे रखडलेले प्रकल्प आमच्या सरकारने मार्गी लावले आहेत. 

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा माेठा वाटा असल्याने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मोदी यांच्या सत्ता काळात देशातील गरीबी हटविण्याचे काम खऱ्या अर्थाने झाले असल्याची बाबही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केली. १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट केली आहे. तसेच कल्याण शीळ रस्ते बाधितांच्या मोबदल्याचा निर्णय लवकर घेऊन त्यांना मा्ेबदला दिला जाणार आहे. तसेच बदलापूर कांजूरमार्ग मेट्रोचे काम हाती घेतले जाणार आहे या गोष्टीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी आश्वासित केल्या. खासदार शिंदे म्हणाले आपल्या सरकारच्या काळात एमएमआर रिजनला जास्तीत जास्त विकास निधी मिळाला असल्याने हजोरो कोटीची विकास कामे सुरु आहेत.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते डोंबिवलीतील सुतिका गृह आणि कर्कराेग रुग्णालय, डोंबिवली पश्चिमेतील फिश मार्केट आणि कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी आले तेव्हा उपस्थितांना मोबाईल टॉर्च पेटवून त्यांचे जोरदार स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनाचा लाभ वाटप करण्यात आला.

टॅग्स :kalyanकल्याणEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे