शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

केडीएमसीकडून बेकायदा बांधकामांची माहिती देण्यास टाळाटाळ, याचिकाकर्त्याचा आराेप

By मुरलीधर भवार | Updated: March 22, 2024 19:57 IST

उच्च न्यायालयात केडीएमसीने दिलेली माहिती खोटी

कल्याणकल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. आत्ता निवडणूकीची आचार संहिता लागू झालेली आहे. महापालिकेचा अधिकारी वर्ग आणि कामगार हे निवडणूकीच्या कामात व्यस्त असतील. तसेच शनिवार रविवारला लागून येणाऱ््या सलग सरकारी सुट्टया पाहता बेकायदा बांधकाम करणाऱ््यांचे चांगलेच फावले जाणार आहे. अशा परिस्थितीत बेकायदा बांधकामाची माहिती देण्यास अधिकारी वर्गाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते आणि बेकायदा बांधकाम प्रकरणातील याचिकाकर्ते कौस्तूभ गोखले यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली आहे.

बेकायदा बांधकाम प्रकरणात गोखले यांची याचिका उच्च न्यायालयात २०२४ साली दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. महापालिका हद्दीत ६५ बेकायदा इमारत बांधकाम प्रकरणात बिल्डरांनी महापालिकेचे खोटे सही शिक्के तयार करुन खोटी परवानगी खरी भासवून रेरा प्राधिकरमाकडून बांधकाम प्रमाणपत्रे मिळवून नागरीकांसह राज्य सरकार, महापालिका आणि रेरा प्राधिकरणाच फसवणूक केली. या प्रकरणात वास्तू विशारद संदीप पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. त्यापश्चात डोंबिवलीतील हरीचंद्र म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात बेकायदा बांधकाम प्रकरणी याचिका दाखल केली आहे. गोखले यांच्या याचिकेवर अग्यार समिती नियुक्त केली गेली. अग्यार समितीने दिलेल्या अहवालानुसार महापालिका हद्दीत ६८ हजार बेकायदा बांधकामे झाले. त्यानंतर एकही बेकायदा बांधकाम होऊ नये असे न्यायालयाने आदेश बजावले.

त्यानंतरही बेकायदा बांधकामे सुरुच आहेत. आत्ता विद्यमान आयुक्त इंदूराणी जाखड यांनाही न्यायालयात हजर राहावे लागले. त्यांनी बेकायदा बांधकामाची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांवर निश्चित केली. महापालिका मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर राजा हा’टेलनजीक बेकायदा बांधकाम सुरु असल्याची तक्रार गोखले यानी केली आहे. ही बाब त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याते येईल असे म्हटले आहे. महापालिकेने मे २०१५ ते मे २०२३ दरम्यान १३ हजार ८३ बेकायदा बांधकामे पाडल्याचे म्हटले आहे. पाडण्यात आलेली बेकायदा बांधकामे किती चौरस फूटाची हाेती. कारवाई पश्चात त्या जागेवर आेपन ल’ण्ड ट’क्स आकारण्यात आला की नाही अशी माहिती गोखले यांनी महाालिकेकडे मागितली आहे. एका प्रकरणात माहिती देताना १ जानेवारी २०२० ते मार्च २०२३ दरम्यान १२ हजार ९४२ अतिक्रमणे आणि २९ हजार ६३ बेकायदा बांधकामे पाडण्यात आली आहे. तर दहा प्रभाग क्षेत्रात फेब्रुवारी २०२२ ते डिसेंबर २०२३ दरम्यान ३ हजार ७०८ बेकायदा बांधकाम पैकी २ हजा ९६७ बेकायदा बांधकामे पाडण्यात आली अशी माहिती दिली आहे. महापालिकेच्या माहितीत तफावत आहे.

शिवाय बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई करताना पंचनामे केलेले नाही. त्याचबरोबर महापालिकेने अतिधोकादायक आणि धोकादायक अशा एकूण २२४ इमारती पाडण्याची कारवाई महापालिकेने केली. या पाडकामासाठी महापालिकेस ५५ लाख ८७ हजार ५२४ रुपये खर्च आला. हा खर्च संबंधित इमारत मालकांकडून महापालिकेने वसूल केला आहे की नाही ? किती रक्कम वसूल केली. त्यांच्या मालमत्तेच्या बिलात खर्चाचा बोजा चढविला की नाही ? पाडकामातून जो ढिगारा जमा झाला त्याची विल्हेवाट कुठे लावली ? या प्रश्नांची उत्तरे महाापलिकेकडे नाही. ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात केवळ पाच इमारती पाडल्या आहे. त्याचेही पंचनामे महापालिकेने केलेले नाहीत. या प्रकरणी गोखले यांनी राज्य सरकारचे प्रधान सचिव नितीन करीर यांच्याकडे तक्रार केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीMuncipal Corporationनगर पालिका