शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कल्याणमध्ये बसायला कुरकुर? एमडीआरएम, एजीएम दर्जाच्या अधिकाऱ्याची मागणी  

By अनिकेत घमंडी | Updated: June 30, 2024 10:27 IST

मध्य रेल्वेकरिता कल्याण स्थानक हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पण, त्या ठिकाणी रेल्वेचा एकही उच्चपदस्थ अधिकारी बसत नाही.

अनिकेत घमंडी

लाेकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : मध्य रेल्वेकरिताकल्याण स्थानक हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पण, त्या ठिकाणी रेल्वेचा एकही उच्चपदस्थ अधिकारी बसत नाही. एडीआरएम, एजीएम दर्जाचा अधिकारी कल्याण येथे बसू लागला, तर दररोजच्या लोकल गोंधळावर नियंत्रण येईल, असे प्रवाशांना वाटते. गोरा ब्रिटिश साहेब देश सोडून गेला, पण मध्य रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमधील गोऱ्या साहेबाची प्रवृत्ती गेलेली नाही. त्यामुळेच लक्षावधी प्रवाशांच्या हालअपेष्टांकडे रेल्वेचे तुघलकी प्रशासन सहानुभूतीने पाहत नाही. रेल्वेच्या एका तरी वरिष्ठ अधिकाऱ्याने कल्याण जंक्शन येथे बसावे, यासाठी २०११ मध्ये तत्कालीन खासदार आनंद परांजपे, त्यानंतर खा. संजीव नाईक, सुरेश टावरे, बळीराम जाधव यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. मात्र, २०१४ नंतर केंद्रात सत्तांतर झाले आणि त्या मागणीला केराची टोपली दाखविली गेली. 

कल्याणमध्ये भारतीय रेल्वेचा कल्याण रेल्वे यार्ड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असून, त्यासाठी सुमारे २२० एकर जागा रेल्वेकडे उपलब्ध आहे. त्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याबद्दल रेल्वेचे केंद्र, मुंबई विभागीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना त्याचा आराखडा अवगत आहे. त्याचे काम कूर्मगतीने सुरू आहे. ते झपाट्याने होण्यासाठी मुंबई विभागातील अधिकारी लक्ष देत नाही. एकूणच मध्यरेल्वेचे लाखों प्रवासी या रोजच्या त्रासातून सूटण्याची वाट पाहत आहेत. हे तितकेच खरे आहे.

५० वर्षांपासून पॉवर हाउस बंद- ठाकुर्लीतील चोळा येथील ब्रिटिशकालीन पॉवर हाऊस बंद पडून ५० वर्षे झाली, परंतु त्या जागेचा योग्य वापर रेल्वेने केलेला नाही. त्या मोकळ्या भागातून रेल्वेचे भंगार चोरी होते. - तेथे अनैतिक धंदे, नशाबाजी असे उद्योग सर्रास सुरू असतात. त्याचा ताण स्थानिक पोलिस, लोहमार्ग पोलिस, आरपीएफ यंत्रणांवर पडतो.

संघटनांचे म्हणणे काय ?- सह विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि सह व्यवस्थापक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय येथे हलविल्यास या भागातील रेल्वे अधिकाऱ्यांमधील मरगळ दूर होईल, प्रकल्पाच्या कामात आलेली शिथिलता झटकली जाईल, असे संघटनांचे म्हणणे आहे. - प्रवासी संघटना अथवा सामान्य प्रवासी यांना तक्रार करायची असेल, तर थेट मुंबईत जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे जावे लागते. कल्याणला वरिष्ठ अधिकारी बसले, तर येथेच तक्रार करणे व त्यावर उपाय करणे सोपे होणार आहे.

अधिकारी पाहतात आपली सोय- मध्य रेल्वेवरील प्रवासी अपघात कल्याण-ठाणेदरम्यान होतात. रेल्वेच्या नव्या पुलामुळे मुंब्रा भागात लोकल एका दिशेला कलंडते, दरवाजात उभे असणाऱ्या प्रवाशांचा हात लोकलच्या खांबावरून किंवा डब्यावरच्या खाचेतून निसटतो आणि प्रवासी थेट खाली पडतो. - ही वस्तुस्थिती पाहायला रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वतः येणे गरजेचे आहे, पण उत्तरेतून किंवा देशाच्या वेगवेगळ्या भागांतून मुंबईत नियुक्त होणारे अधिकारी आपली सोय पाहतात व दिवस ढकलतात.

... तर लोकलचा गोंधळ आटोक्यात येईल- मुंबईतील वातानुकूलित दालनात बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी कल्याणमध्ये ठाण मांडले, तर लोकलचा गोंधळ आटोक्यात येईल व रेल्वे यार्ड प्रकल्पालाही गती मिळेल. - उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्था, ठाणे, दिवा, वांगणी, कल्याण, कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन, के-थ्री संघटना या प्रवासी संघटना त्यासाठी प्रयत्नशील आहेत; मात्र दक्षिण मुंबईत वास्तव्य करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांची कल्याणपर्यंत दररोज प्रवास करण्याची इच्छाशक्ती नाही. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणrailwayरेल्वे