शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे कल्याण ग्रामीणमधून इच्छुक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2024 17:41 IST

राजकीय चर्चांना उधाण... ग्रामीणमध्ये होणार तिहेरी लढत? 

मयुरी चव्हाण काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण डोंबिवली शहरातलं राजकारण राज्यामध्ये कायमच चर्चेचा विषय राहिलाय. लोकसभा निवडणुका झाल्या मात्र आता विधानसभेमध्ये राजकीय फटाके फुटणार असे चित्र दिसून येते .त्यातच कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटातील अनेक जण इच्छुक असल्याची चर्चा आहे. यामध्ये डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जातेय. एकीकडे कल्याण ग्रामीण हा मतदारसंघ मनसेकडे आहे. मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील हे या विधानसभेचे नेतृत्व करतायेत. मनसेने लोकसभेला खासदार शिंदेंना दिलेला  पाठिंबा आणि आता विधानसभेच्या निवडणुका यामध्ये कल्याण ग्रामीण बाबत नेमकं शिंदेंची शिवसेना  आणि विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार ते पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 

राजेश मोरे हे सुरुवातीला राष्ट्रवादी पक्षामध्ये होते. त्यानंतर ते शिवसेनेमध्ये आले. तेव्हापासून शिंदेंचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. शांत, संयमी आणि पक्ष बांधणीचे कसब असलेले मोरे यांना सभागृह नेतेपद सुद्धा देण्यात आले. त्यानंतर डोंबिवली शहर प्रमुख पदही पक्षाने त्यांना दिले. डोंबिवली शहरामध्ये राजेश मोरे यांचा चांगला जनसंपर्क आहे. कल्याण ग्रामीणचा बऱ्यापैकी भाग हा डोंबिवली शहराला लागून आहे जवळपास ३१ प्रभाग डोंबिवली मध्ये येतात आणि या ठिकाणी राजेश मोरे यांचे  पारडे जड असल्याचे  त्यांच्या समर्थकांचे म्हणणं आहे.

कल्याण ग्रामीण मध्ये निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी तयारीला सुरुवात केली असून घराघरात जाऊन चाचणी केली जात आहे त्याचप्रमाणे मतांची गणित जुळवण्याचा सुद्धा कामाला सुरुवात झाली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत राजेश मोरे यांना संपर्क साधला असता आपण कल्याण ग्रामीण मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची गोष्ट त्यांनी मान्य केली मात्र भविष्यात वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलं.

तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांचा सुद्धा नाव आघाडीवर असून भोईर यांनी सुद्धा निवडणुकीमध्ये संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी केली आहे. पण शिवसेना शिंदे गट इथून निवडणूक लढवणार का की या विधानसभेत बंडखोरी होणार ? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. राजू पाटील,  सुभाष भोईर ,राजेश मोरे हे सर्व  भावी उमेदवार आगरी समाजाचे असल्याने  आगरी मतांचं विभाजन या ठिकाणी होणार हे मात्र नक्की पण इतर भाषिकांचा कल हा नेमका कोणत्या पक्षाला जातो की उमेदवार बघून मतदार मतदान करतात ? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल...

टॅग्स :kalyanकल्याणkalyan-rural-acकल्याण ग्रामीणShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण