शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

"मुलींच्या पालकांना जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल तर..."; देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 15:00 IST

बदलापूर प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

Badlapur School Case: बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरात बंद पुकारण्यात आला आहे. तर संतप्त नागरिकांकडून शाळेची तोडफोड करण्यात आली आहे. दुसरीकडे नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन करुन रेल्वेमार्ग रोखून धरला आहा. आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी सोमवार बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी शाळेत घुसून तोडफोड केली आहे. तर रेल्वे स्थानकावर असलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावा यासाठी सरकार तात्काळ प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

"बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. शाळेतील दोन लहान मुलींना सफाई कर्मचाऱ्याने ज्या प्रकार अत्याचार केला ते अतिशय निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेचा लोकांमध्ये उद्रेक पाहायला मिळतो आहे. आम्ही तात्काळ वरिष्ठ आयपीएस अधिकारी भारती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र तयार करण्यास सांगितले आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मागवण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीत आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावा हा सरकारचा प्रयत्न असेल. त्यासाठी कारवाईची सुरुवात वेगाने करण्यात आलेला आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

"लोकांचा जनसुमुदाय स्वयंस्फूर्तीने आला की कसा आला याच्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही. भावनांचा उद्रेक असू शकतो. तिथे तात्काळ फाशीची मागणी केली जात आहे. मला असं वाटतं की, कायद्यानुसार जे तात्काळ करता येईल ते करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. ज्या संवेदनशिलतेने काम केले पाहिजे तसा प्रयत्न पोलिसांचा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ यासाठी प्रयत्न करायला हवा. ही घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. तरीही त्यामध्ये कोणीही दिरंगाई केली आहे का किंवा कोणी काही लपवले का याची चौकशी एसआटीमार्फत होणार आहे. पीडितांच्या पालकांना जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल, एफआयआर दाखल करायला जाणीवपूर्वक उशीर केला असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीUddhav Thackerayउद्धव ठाकरे