शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

ठाणे, कल्याण, की भिवंडी? महिलांना मिळणार कुठली हुंडी?; २०२९ मध्ये महिला खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 06:42 IST

पुरुष खासदारांची शेवटची निवडणूक, अनेकांनी मतदारसंघ राखीव होताच आपल्या पत्नी, बहीण यांना संधी दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेच होण्याची भीती व्यक्त होत आहे.

अनिकेत घमंडीडोंबिवली : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नव्या इमारतीत आणलेल्या दीर्घकाळ प्रलंबित विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटली व त्याची २०२९ मधील लोकसभा निवडणुकीत अंमलबजावणी झाली, तर ठाणे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना त्याचा फटका बसणार आहे. 

सध्या ठाण्यातून खासदार राजन विचारे, कल्याणमधून खासदार श्रीकांत शिंदे, भिवंडीतून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. तिघांनी ही २०१४ व २०१९ अशा दोन्ही वेळेस त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२४ च्या निवडणुकीत हे तिघे पुन्हा रिंगणात दिसतील, हे निर्विवाद सत्य आहे. २०२९च्या निवडणुकीत या तीन लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ महिलांकरिता राखीव झाला, तर त्यांच्याकरिता २०२४ ची लोकसभा निवडणूक ही अखेरची असणार आहे.

गतवर्षीच्या राजकीय भूकंपानंतर खा. विचारे हे उद्धव ठाकरे गटाचे, तर खा. शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार आहेत. खा. पाटील हे भाजपचे आहेत. राज्यात जरी शिंदे-फडणवीस-पवार असे महायुतीचे सरकार असले तरी कल्याण मतदारसंघात खा. शिंदे यांच्याशी भाजपचे फारसे जुळत नाही. खा. पाटील यांचे विद्यमान आमदार किसन कथोरे, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याशी मतभेदांमुळे फारसे जुळत नाही.

ठाणे लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहे. तो भाजपला हवा आहे. कल्याण मतदारसंघ शिंदे गटाकडे आहे. भिवंडी भाजपाकडे आहे. समजा यापैकी एक मतदारसंघ राखीव झाला तर अन्य दोन मतदारसंघांतील पुरुष उमेदवार दुसऱ्या मतदारसंघात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार का, असा प्रश्न आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण या लोकसभा मतदारसंघांपैकी कोणताही मतदारसंघ महिलांकरिता राखीव झाला तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असो की मनसे, या एकाही पक्षाकडे महिला उमेदवार कोण असू शकतो, हे आताच ठामपणे सांगता येणार नाही.  सर्वच पक्षांत दीर्घकाळ पक्षकार्य केलेल्या, महापालिकांमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या महिला आहेत.

राजकारणातील भ्रष्टाचार कमी करण्याकरिता महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी दिले होते. अनेकांनी मतदारसंघ राखीव होताच आपल्या पत्नी, बहीण यांना संधी दिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेच होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :Women Reservationमहिला आरक्षणlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक