शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

राहुल गांधींवरील कारवाई सूडबुद्धीनेच; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकरांची टीका

By प्रशांत माने | Published: March 26, 2023 4:52 PM

विरोधकांबद्दल ईडी किंवा दुस-या कारवाईची भीती दाखवणे हा भाजपाचा खेळ आहे. तो देशाच्या लक्षात आलाय.

कल्याण - राहुल गांधी यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीने झाली असून देशात द्वेषाचे राजकारण सुरू असल्याचे मत वंचित बहुजन आघाडी प्रशिक्षण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्षा प्रा. अंजली आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना मांडले. वंचित बहुजन ठाणे जिल्हा महिला आघाडीची निर्धार सभा शनिवारी कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रिडांगणावर पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिका-यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

हिंदू आक्रोश मोर्चावरून आंबेडकर यांनी भाजपाला लक्ष केले. तुमचा आक्रोश मोर्चा कशाबद्दल हा प्रश्न भाजपला विचारण्याची गरज आहे ८० तक्के समाज हिंदू आहे. हिंदूंवर काय अन्याय झाला की त्यांना आक्रोश मोर्चा काढावा लागतो. हिंदुत्वाच्या नावाखाली भडकवल जातं तेव्हा रस्त्यावर उतरणारा युवक हा बहुजन तरुण असतो. मुळात ८० टक्के एका बाजूला आहेत तर २० टक्के लोकांची काय भीती आहे हे विचारण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आज भारतातली सगळी सत्ता त्यांच्या हातात आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे असे सगळे इंडस्ट्रियलिस्ट अदानी सारखे उद्योगपती त्यांच्यासोबत आहे. त्यांनी देशाला मोठया प्रमाणात फसवले, पैसा लुबाडला हे सगळं समोर येत असताना आक्रोश मोर्चा हा खरं म्हणजे भाजप आणि मोदींच्या विरोधात असायला हवा असा टोला आंबेडकर यांनी लगावला.

गुजरातमधील न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर न्यायालयाने स्वत:च्याच निर्णयाला स्थगिती दिली आणि राहुल गांधींना उच्च न्यायालयात जाण्याची संधी दिली आहे. ज्या वेळेला स्थगिती दिली जाते त्यावेळेला उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत त्यांच्यावर कोणी कारवाई करायचे नसते त्यामुळे राहुल यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीने केलेली असून हे द्वेषाचे राजकारण असल्याचे त्या म्हणाल्या. आंबेडकर यांनी संजय राऊत हक्कभंगाच्या मुद्दावरही भाष्य केले. विरोधकांबद्दल ईडी किंवा दुस-या कारवाईची भीती दाखवणे हा भाजपाचा खेळ आहे. तो देशाच्या लक्षात आलाय. मात्र वंचित बहुजन आघाडी कोणत्याही प्रकारची वैचारिक तडजोड न करता भाजपावर टीका करते मात्र आमच्यावर ईडी येऊ शकत नाही कारण आमचे सगळयांचे स्वच्छ व्यवहार आहेत याकडेही आंबेडकरांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपा