शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

कल्याण दुर्गाडी परिसरातील आरमार स्मारकाची सेवानिवृत् व्हाॅईस अॅडमिरल एस. व्ही. भोकरे यांनी केली पाहणी

By मुरलीधर भवार | Published: November 10, 2022 4:42 PM

कल्याण डाेंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणच्या दुर्गाडी खाडी किनारी मराठा आरमाराचे स्मारक उभारत आहे.

कल्याण-कल्याण डाेंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणच्या दुर्गाडी खाडी किनारी मराठा आरमाराचे स्मारक उभारत आहे. या स्मारकाची पाहणी नाैसेनेचे सेवानिवृत्त अॅडमिरल एस. व्ही. भाेकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे उपस्थित हाेते. 4 डिसेंबर राेजी नाैसेना दिनी या स्मारकाचे लाेकार्पण करण्यात येणार आहे.

स्मारक स्वरुपात युध्द नौका टी-८० विराजमान करण्याबाबत नौदल आणि कल्याण डाेंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्प यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. आज करण्यात आलेल्या पाहणी प्रसंगी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, महापालिका सचिव संजय जाधव उपस्थीत हाेते.उपायुक्तछत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्यानजीक मराठा आरमाराची सुरुवात केली.त्याच खाडी किनाऱ्यचा विकास केला जात आहे. त्याच एक भाग म्हणून इथे नौदल संग्रहालय उभारले जात आहे. त्याचा आराखडा भारतीय नौसेनेच्या सबमरीननुसार तयार केला आहे.

सुमारे १११ मी. लांब असलेल्या या सबमरीनच्या संग्रहालयात १७ ते १८ व्या शतकापर्यंत मराठा योध्यांच्या आरमारांचा इतिहास आणि ब्रिटीशांच्या रॉयल नेव्हींपासून स्वतंत्र भारताच्या नौसेनेचा आजपर्यंत इतिहास प्रसिध्द केला जाईल. हा इतिहास पेंटींग, शिल्प, मॉडेल व मल्टीमिडियाच्या स्वरुपात आहे. भारताच्या अरिहंत या पहिल्या पाणबुडीवरुन प्रेरीत होऊन या सबमरीनसचा आराखडा बनवण्यात आला आहे,अशी माहिती एसकेडीसीएल चे हेरिटेज व्यवस्थापन सल्लागार सचिन सावंत यांनी दिली. या प्रकल्पाची संकल्पना महापालिकेचे माजी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मांडली होती.

महानगरपालिकेने आरमार रुपी स्मारक उभारण्यासाठी खुप चांगलं ठिकाण निवडलं आहे ,या माध्यमातून पर्यटकांना व विदयार्थ्यांना नौदलाच्या तसेच शिवकालीन इतिहासाबाबत माहिती उपलब्ध होईल आणि महापालिका युध्द नौकेच्या स्वरुपात उभारत असलेल्या स्मारकाच्या रुपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीतील इतिहास पुन्हा जिवंत स्वरुपात सर्वांसमोर उभा राहील असे भोकरे यांनी सांगितले.

४ डिसेंबर १९७१ मध्ये भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करून संपूर्ण बंदर उध्वस्त केले होते आणि पूर्व पाकिस्तानातून पश्चिम पाकिस्तानात जाणारी जलवाहतूक पूर्णपणे बंद केली होती. ज्याचा परिणाम म्हणून जमिनीवर पश्चिम पाकिस्तानला कोणतीही मदत मिळू शकली नाही. ज्यामुळे भारतीय लष्कराने १९७१ चे युद्ध एकहाती जिंकल्याचा आपल्याला संदर्भ मिळतो. त्या दिवसाचे स्मरण म्हणून भारतीय नौसेना ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनी लोकार्पण प्रस्तावित करण्यात आले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण