शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रस्त्यावरील डांबर उखडून गेले वाहून; नालंबी मार्गाची दोन वर्षांत दुरुस्ती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 06:37 IST

टँकर, सिमेंट रेडिमिक्स वाहनामुळे मोठ्या अपघाताची भीती

पंकज पाटीलअंबरनाथ : तालुक्याला कल्याण ग्रामीण भागाशी जोडणारा नालंबी रोड सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्यामुळे, या रस्त्यावरील सर्व डांबर वाहून गेल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरून उल्हास नदीतून बेकायदा पाणी भरून जाणारे टँकर तसेच सिमेंट प्लांटमधून रेडिमिक्स काँक्रिटची वाहतूक, अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.

ग्रामीण भागातील नालंबी भिसोळ आणि आपटी ही सर्व गावे अंबरनाथ शहराशी या रस्त्याने जोडली गेली आहेत. दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामस्थ अंबरनाथ शहरात येत असतात. आधी हा रस्ता सुस्थितीत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धोकादायक अवस्थेत आहे. २०२१ मध्ये या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र दुरुस्ती केल्यानंतर वर्षभरदेखील हा रस्ता टिकला नाही. पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी खचला. संबंधित ठेकेदाराने पावसाळा झाल्यानंतर या ठिकाणी पॅचवर्क करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. काम निकृष्ट झाल्यामुळे अवघ्या सहा महिन्यातच खड्डे पडले. 

यंदाच्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खचला. अंबरनाथच्या कोहजगावपासून नालंबीकडे जाणाऱ्या या डोंगराळ रस्त्यावर अनेक ठिकाणी अवघड वळणे असल्यामुळे त्या ठिकाणी योग्य डांबरीकरण करणे गरजेचे होते. मात्र डांबरीकरण न केल्याने अवघड वळणावर मोठी वाहने उलटण्याचा धोका निर्माण झाला.अंबरनाथहून टिटवाळ्याकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. यासोबतच हा रस्ता मुरबाडमार्गे नगरकडे जात असल्यामुळे अनेक वाहने या मार्गावरून जात असतात.

उल्हास नदीमधून अनेक टँकर माफिया पाणी चोरून याच रस्त्यावरून अंबरनाथ शहरात पुरवठा करीत आहेत. त्यामुळे बेकायदा चालणाऱ्या टँकरमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे.

कल्याण ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी रेडिमिक्सचे प्लांट उभारण्यात आल्याने त्या प्लांटमधून अंबरनाथकडे मोठ्या प्रमाणात रेडिमिक्स काँक्रिटच्या गाड्यांचा ताफा जात असल्याने हा रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले.

टॅग्स :ambernathअंबरनाथroad safetyरस्ते सुरक्षा