शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

'मी नरकातून बोलतोय' हिंदी व्यंगकथांचा मराठी अनुवाद प्रसिद्ध 

By अनिकेत घमंडी | Updated: June 10, 2024 14:52 IST

अलका अग्रवाल यांनी जेष्ठ हिंदी व्यंगलेखक स्व.हरिशंकर परसाईंच्या आठवणीना उजाळा दिला.

डोंबिवली: अनुवाद हा दोन भाषांना जोडणारा पूल आहे, असे साहित्यिक, अभ्यासक शीतला प्रसाद दुबे म्हणाल्या. कल्याण येथील श्री राम मारुती मंदिरात, 'मी नरकातून बोलतोय' ह्या हिंदी व्यंगकथांचा मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला. त्यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी कार्याध्यक्ष दुबे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यानिमित्ताने अनुवादक भाऊ काळकर यांनी हिंदी व्यंगलेखक स्व.शंकर पुणतांबेकर यांच्या आठवणी सांगितल्या. 

अलका अग्रवाल यांनी जेष्ठ हिंदी व्यंगलेखक स्व.हरिशंकर परसाईंच्या आठवणीना उजाळा दिला. डॉक्टर श्यामसुंदर पांडेय यांनी व्यंग साहित्यावर विवेचन केले. गीताई काळकर यांनी स्वागत पर भाषणात पुस्तकाचे लिखाण ते प्रकाशन याचा प्रवास सांगितला. दीप प्रज्वलनाने व सरस्वती वंदनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. मराठी भाषिक नाटकवेडे व साहित्यात रुची ठेवणारे आहेत. कल्याण डोंबिवलीत मराठी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने विविध स्तरावर काम होत आहे. विविध भारतीय भाषांतील अनुवाद इतर भाषांमध्ये होणे आवश्यक आहे. 

या पुस्तकाच्या निमित्ताने करण्यात आलेला अनुवाद हा अत्तराच्या बाटली सारखा सर्वत्र सुगंध पसरवत असल्याचे त्या म्हणाल्या. साहित्यिक प्रविण देशमुख यांनी पुस्तकातील 'मी नरकातून बोलतोय 'ही कथा साभिनय सादर केली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आनंद सिंग यांनी केले. त्यांच्या खुमासदार शैलीत वक्त्यांची ओळख करून देताना साहित्याचे विवेचन केले. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ कल्याण तर्फे अनुवादक काळकर यांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :kalyanकल्याण