शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

स्वतःच्या पलिकडे जाऊन विचार करा : डॉ. कोल्हटकर

By सचिन सागरे | Updated: February 27, 2023 14:47 IST

याज्ञवल्क्य आणि सुशिलाबाई एकलहरे पुरस्कार सोहळा

सचिन सागरे

कल्याण : प्राणी आणि आपल्यामध्ये काही गोष्टी समान आहेत. मग आपल्यात आणि प्राण्यांमध्ये फरक काय आहे तर माणसाचे अस्तित्व आणि स्वभाव. मात्र आपण आपल्या कर्तव्याचे पालन केले नाही, आपल्या पलिकडे जाऊन आपण बघितले नाही तर प्राण्यांमध्ये आणि आपल्यात कोणताच फरक राहणार नाही. माणसाचा जन्म हा स्वार्थातून झाला असून तो स्वतःच्या पलिकडे जात नाही. मात्र, आपण सर्वांनी स्वतःच्या पलिकडे जाऊन बघण्याची गरज आहे. आज पुरस्कार प्राप्त झालेल्या या सर्व व्यक्ती आपल्या कार्यातून नेमका हाच संदेश देत आहेत की, स्वतःच्या पलिकडे जाऊन विचार करा असे मत जनरल एज्यूकेशन इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी व्यक्त केले.

कल्याणच्या के. सी. गांधी शाळेच्या सभागृहात रविवारी संपन्न झालेल्या याज्ञवल्क्य आणि सुशिलाबाई एकलहरे पुरस्कार सोहळ्यात ते प्रमूख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तींचा डॉ. कोल्हटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कल्याण जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष वामनराव साठे यांचा याज्ञवल्क्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तर, डंपिंग ग्राऊंडवरील मुलांसाठी अनुबंध संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या प्रा. मीनल सोहनी आणि कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल राजावाडी रुग्णालयाच्या डीन डॉ. विद्या ठाकूर यांचा सुशिलाबाई एकलहरे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी याज्ञवल्क्य संस्थेचे विश्वस्त डॉ. सुरेश एकलहरे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अध्यक्ष आ. वा. जोशी, उपाध्यक्ष धनंजय पाठक, राधाकृष्ण पाठक, राजीव जोशी, प्रसन्न कापसे, अमोल जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका