शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

तपासानंतर ‘त्या’ बोगस जागा रिक्त करणार; अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:41 IST

गोंडवाना मित्र मंडळाचा ३१ वा सामाजिक व सांस्कृतिक वार्षिक मेळावा कल्याणमध्ये पार पडला

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : आदिवासी बांधवांसाठी असलेल्या मेडिकलमध्ये भरती केलेल्या साडेचारशे जागांपैकी बोगस डॉक्टरांचा आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (टीआरटीआय) माध्यमातून तपास करण्यात येणार आहे. त्यांच्या तपासानंतर बोगस जागा रिक्त करण्यात येतील, असे आश्वासन अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी रविवारी येथे दिले. गोंडवाना मित्र मंडळाचा ३१ वा सामाजिक व सांस्कृतिक वार्षिक मेळावा कल्याणमध्ये झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पालिकांमध्ये आदिवासींसाठी असलेल्या अर्थसंकल्पाचा योग्य पद्धतीने विनियोग होत नाही. याबाबत संबंधित पालिकांमधील सगळ्या आयुक्त, समाज विभागाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करून मागणी करणार आहे, असे झिरवळ म्हणाले. चंद्रपूर अथवा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद द्यावे. १३ जिल्ह्यांमध्ये आदिवासीबहुल भाग आहे. त्यापैकी कोणत्याही एका जिल्ह्याचा पालकमंत्री करा, अशी मागणी नेहमीच करत असल्याचे ते म्हणाले.

...तर राज्यसुद्धा चालवू शकतो

या खात्यात खूप आव्हाने आहेत. कारण मनुष्यबळ कमी आहे. साधनांची कमतरता असण्याबरोबरच राज्यात केवळ तीनच चाचणी प्रयोगशाळा आहेत. त्यांची वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हे खाते मला मुख्यमंत्री पदासारखेच वाटते आणि म्हणून विनोदाने म्हणतो की, मी सभागृह चालवले तर राज्यसुद्धा चालवू शकतो, असे झिरवाळ म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना झिरवाळ म्हणाले, दोघे एकत्र आले तर चांगले होईल, अशी चर्चा आहे.

राजीनामा मागणे बरोबर नाही

राजीनामा मागणे अथवा एखाद्यावर आरोप करणे हे बरोबर नाही. जो खरा दोषी असेल त्याचा तपास केला जाऊन त्याला कठोर शिक्षा केली जाईल. मात्र, कुणी तरी सांगावे व कोणी दोषी ठरवावे हे बरोबर नसल्याचे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर त्यांनी भाष्य केले.

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळ