शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
3
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
4
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
5
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
6
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
7
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
8
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
9
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू

By प्रशांत माने | Published: October 09, 2022 3:50 PM

एकाला वाचविण्यात यश, भोपर गावातील घटना; खदानी ठरतायत मृत्यूचे सापळे

डोंबिवली: येथील भोपर गावातील गावदेवी मंदिरामागील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी दोघा मुलांचा बुडून दुर्देवी मुत्यु झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. अन्य एका बुडणा-याला उर्वरीत तिघांनी वाचविले. मे महिन्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना संदप-भोपर परिसरात घडली होती. रविवारी घडलेल्या घटनेमुळे खदानी ठरतायत मृत्यूचे सापळे ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

आयुष केदारे (वय १२) आणि आयुष गुप्ता (वय १३) दोघेही रा. आयरेगाव, ज्योतीनगर झोपडपट्टी अशी मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. हे दोघे रविवारी सुट्टी असल्याने सकाळी अतुल अवटे, किर्तन म्हात्रे, पवन चव्हाण, परमेश्वर घोडके यांसह अन्य काही मित्रांबरोबर ज्योतीनगरमधील एका शाळेच्या पटांगणावर क्रिकेट खेळत होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोघेजण अतुल, किर्तन, पवन आणि परमेश्वर यांच्यासह सायकलवरून भोपर येथील खदानीच्या पाण्यात पोहायला गेले होते. खदानीत उतरलेल्या सहाजणांपैकी अतुल, पवन, किर्तन हे खदानीच्या काठावर तर आयुष केदारे, आयुष गुप्ता आणि घोडके हे खोलवर पाण्यात पोहायला गेले होते. त्या तिघांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले. यातील घोडकेला वाचविण्यात अन्य तिघांना यश आले परंतू दोघेही आयुष हे चिखलात रूतले गेल्याने त्यांना वाचविता आले नाही. ते बुडाल्याने चौघांनी आरडाओरड करायला सुरूवात केली. स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

पलावा अग्निशमन दल आणि मानपाडा पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या शोध कार्यात दोघांचे मृतदेह हाती लागला. दरम्यान या घटनेने आयरेगाव, ज्योतीनगर झोपडपट्टीत शोककळा पसरली आहे.

डोंबिवली नजीकच्या संदप, खोणी, भोपर, चिंचपाडा, पलावा या ग्रामीण भागाच्या ठिकाणी अशा अनेक खदानी आहेत. त्याचा वापर गणेश विसर्जनासाठी होतो. एप्रिल- मे महिन्यात गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने तेथील लोक कपडे धुण्यासाठी देखील या खदानींचा वापर करतात. मे महिन्यात पाणी टंचाईमुळे कपडे धुण्यासाठी खदानीवर गेलेल्या भोपर-देसलेपाडा परिसरातील एकाच कुटुंबातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. संदप-भोपर परिसरातील खदानीत  ही घटना घडली होती. आता रविवारी भोपर गावातील खदानीत दोघांना जीव गमवावा लागला आहे.  एकुणच ग्रामीण परिसरातील खदानींवर घडलेले आजवरचे अपघात पाहता संबंधित यंत्रणेने त्या कायमस्वरूपी बुजविणे गरजेचे आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल का?अन्यथा हा जीवघेण्या अपघातांचा सिलसिला कायम चालू राहील यात शंका नाही.