शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धर्मवीर आनंद दिघे बालउद्यानातील पावसामुळे दोन वृक्ष उन्मळून पडले

By अनिकेत घमंडी | Updated: November 11, 2023 12:54 IST

उद्यानाची झाली आहे दुर्दशा.

डोंबिवली: येथील एमआयडीसी निवासी मधील धर्मवीर आनंद दिघे बालउद्यानात काल सायंकाळी/रात्रीचा वेळेस एकाच ठिकाणी दोन मोठे आकाशिया जातीचे वृक्ष पावसामुळे कोसळले. सुदैवाने त्यावेळी उद्यानात खेळण्यासाठी येणारी लहान मुले आणि फेरफटका, चालण्यासाठी येणारे वरिष्ठ नागरिक तेथे नसल्याने कोणतीही दुर्दैवी घटना झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच तेथेच जवळ राहणारे माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे आणि शिवसेना उपशाखाप्रमुख सागर पाटील यांनी अग्निशमनदलाला कळविले.

अग्निशमनदलाने सदर वृक्षांचा मोठ्या फांद्या तोडून ते उद्यानाचा कडेला एका बाजूस आणून ठेवले आहे. धर्मवीर आनंद दिघे बालउद्यान हे सन 2002 मध्ये तत्कालीन नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांच्या प्रयत्नाने कल्याण डोंबिवली महापालिका यांनी एमआयडीसी कडून भूखंड घेऊन विकसित केले होते. सदर उद्यान उद्घाटनसाठी शिवसेना नेते मधुकर सरपोद्दार आणि धर्मवीर आनंद दिघे उपस्थित होते. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून 2017 साली याचे सुशोभीकरण करण्यात आले होते.

 याच धर्मवीर आनंद दिघे बालउद्यानाची गेल्या तीन वर्षापासून अतिशय खराब दुर्दशा झाली असून झाडी झुडपे वाढली आहेत तर लहान मुलांची खेळणी मोडकळीस आलेली आहेत. उद्यानाभोवती असलेले सुरक्षा कुंपण/जाळी काही ठिकाणी तुटलेले आहे. यामुळे गैरप्रकार करणारे लोक रात्रीचा वेळेस यात प्रवेश करतात. या उद्यानातील झाडांच्या फांद्याची छाटणी वेळोवेळी केली गेली पाहिजे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पथदिव्यांचा प्रकाश पडून येथे चालणारे गैरप्रकार थांबतील आणि भविष्यात झाडेही पडणार नाहीत. येथील स्थानिक नागरिकांनी केडीएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना याबाबत कळवूनीही याची दखल घेतली गेली नाही आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने आणि त्यांचा पदस्पर्शाने निर्माण झालेल्या या बालउद्यानाची कमीतकमी देखभाल, दुरुस्ती, निगा ही केडीएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन केली पाहिजे अशी अपेक्षा येथील निवासी भागातील नागरिक व्यक्त करीत असल्याचे दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी सांगितले.