शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

'हा महाराष्ट्रातील सर्व महिलांचा विजय'; शक्ती कायदा मंजूर होताच मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 01:16 IST

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला. विरोधकांनीही या कायद्याचं स्वागत केलं आहे.

डोंबिवली : शक्ती कायदा मंजूर होताच मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया देत, हा महाराष्ट्रातील सर्व महिलांचा विजय आहे असल्याचे म्हटले आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी 2019 साली दिशा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा राज्यात लागू करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती व त्याबाबतचे पत्र सुद्धा दिले होते. यानंतरही मनसे आमदार पाटील यांनी हा कायदा लागू करा, अशी मागणी वारंवार लावून धरली होती. अखेर त्याच्या मागणीला आज यश आले. 

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शक्ती कायदा एकमताने मंजूर झाला. विरोधकांनीही या कायद्याचं स्वागत केलं आहे. बलात्कार, सामूहिक बलात्कार, ॲसिड हल्ला, सोशल मीडियावर महिला आणि लहान मुलांबाबत वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्र प्रसारित करून बदनामी करणे, अशा सर्व प्रकरणांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

दिशा कायद्याला मंजुरी मिळतच मनसे आमदार पाटील यांनी  ट्विटरवर जुनी पोस्ट शेअर करत पुन्हा एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, महाराष्ट्रातील वाढते बलात्कार व महिला अत्याचारा विरोधात 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर कठोर कायदा व्हावा यासाठी मी नेहमी आग्रही होतो व पाठपुरावा करत होतो. अखेर आज शक्ती कायदा विधानसभेत एकमताने मंजूर. हा महाराष्ट्रातील सर्व महिलांचा विजय आहे.

२०१९ साली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसे आमदार राजू पाटील यांनी जे पत्र दिले होते ते असे - आंध्रप्रदेश सरकारने विधानसभेमध्ये शुक्रवार दि. १३/१२/२०१९ रोजी क्रिमिनल लॉ (संशोधन) कायदा पास करून, अशा प्रकारचा कायदा करणारे देशातील पहिले राज्य बनण्याचा मान मिळविला त्याबद्दल आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री मा. जगनमोहन रेड्डी व त्यांचे सरकार अभिनंदनास पात्र आहे. सदर कायद्यामध्ये आय.पी.सी. कलम ३५४ मध्ये सुधारणा करून नवीन ३५४ (ई) करून बलात्कार व सामुहिक बलात्कार, अशा प्रकारचा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या सात दिवसांत तपास व पुढच्या चौदा दिवसात न्यायालयात जलद गतीने सुनावणी घेवून एकवीस दिवसाच्या आत दोषींना फाशी सारखी शिक्षा देण्याची तरतुद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातही बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात वर्षानुवर्षे तपास व सुनावणी सुरु असते. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक व वचक राहिलेला नाही व बलात्कार पिडितेला योग्य न्याय मिळण्यास मोठा कालावधी लागत आहे. महाराष्ट्रातही आंध्रप्रदेशप्रमाणे कठोर कायदा करण्याची वेळ आता आलेली आहे. राज्यातील जनता अशा प्रकारच्या कायद्याची वाट पाहत आहे. तरी कृपया आपण बलात्कार पिडितांना जलद गतीने न्याय देण्यासाठी व दोषींना कठोर शिक्षा मिळून अशा घटनांना आळा बसावा याकरीता आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही 'दिशा' सारखा कायदा संमत करावा, ही विनंती. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMolestationविनयभंगWomenमहिलाvidhan sabhaविधानसभा