शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

जागा नावावर एकाच्या, कब्जा दुसऱ्याचा; विरार आलिबाग कॉरिडॉर प्रकल्पातील बाधित शेतकऱ्याचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 17:08 IST

ज्या शेतकऱ्यांकडे जमीनाचा कब्जा आहे त्यांनाच मोबदला द्यावा

कल्याण-विरार आलिबाग कॉरिडॉर प्रकल्पात भोपर गावातील १०० शेतकऱ्यांची जमीन बाधित होत आहे. प्रकल्पाने बाधित होणाऱ्या जमीनीवर ज्या शेतकऱ्यांचा कब्जा आहे. त्यांना सरकारने मोबदला द्यावा. त्यांना मोबदला दिला नाही तर कल्याण प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला आहे.

आज भाजपचे पदाधिकारी संदीप माळी यांनी कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत बाधित शेतकरी उपस्थित होते. त्यांनी प्रांत अधिकारी गुजर यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी शेतकरी विश्वास माळी, मधूकर माळी, सुनिल पाटील, शक्ती माळी, जयवंत माळी, तानाजी पाटील, तानाजी माळी, कनिक पाटील आदी उपस्थित होते. काही बिल्डरांनी जागा विकत घेतल्या आहेत. काही प्रकरणात कब्जा माझा आहे. जागा दुसऱ्यांच्या नावे आहे. तर काही जागा दुसऱ्यांच्या नावावर आहे. तर कब्जा आमच्या नावावर आहे. त्यांच्याकडून परस्पर जागेचा मोबदला घेण्याचा प्रयत्न होते.

त्यांना सरकारी मोबदला देऊ नये. जे कब्जेदार आहे. त्यांना मोबदला दिला जावा. काही लोकांनी शेतकऱ्यांला बाजूला टाकून सावकाराला हाताशी धरुन स्वत:च्या नावे जागा केली आहे. अशा लोकांना सरकारने धडा शिकवला पाहिजे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखळ केला पाहिजे. काही लोकांनी चिटींगकरुन जागा नावावर केलेल्या आहेत. त्याना मोबदला न देता कष्टकरी शेतकऱ्याला मोबदला द्यावा. या प्रकरणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह मनसे आमदार राजू पाटीलय यांच्याकडे ही दाद मागणार आहोत. आम्हाला न्याय मिळाला नाहीत भोपर गावातील बाधित शेतकरी प्रांत कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा संदीप माळी यांनी दिला आहे.

शेककरी मधुकर माळी यांनी सांगितले की, बाधित जागा कोणाच्या कब्जात आहे. कोणाच्या नावार आहे. जो शेतकरी १०० वर्षापासून शेतजमीन कसतो. त्याला न्याय मिळत नसेल तर त्या प्रकरणी दाद मागण्यासाठी प्रांत कार्यालयात आलो होतो.

या प्रकरणी प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांनी सांगितले की, संबंधित शेतकरी वर्गाने माझ्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. तसेच त्याचे निवेदनही स्विकारले आहे. बाधित शेतकरी वर्गाने कब्जा ज्यांचा आहे. त्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या हरकतीनुसार त्यांच्या हरकतीची रितसर सुनावणी घेतल्याशिवाय कोणालाही प्रकल्पाचा माेबदला दिला जाणार नाही.

टॅग्स :kalyanकल्याण