शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

माघी गणेशोत्सवाचे वेध: कल्याणातील तलावांची स्वच्छता होणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:26 IST

गणेशोत्सव व नवरात्रौत्सवाच्या धर्तीवर केडीएमसीकडून हद्दीतील सर्वच तलावांची स्वछता केली जाते

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण: गणेशोत्सव व नवरात्रौत्सवाच्या धर्तीवर केडीएमसीकडून हद्दीतील सर्वच तलावांची स्वछता केली जाते पण उत्सव संपताच या तलावांना पुन्हा डंपिंगचे स्वरूप प्राप्त होते. या तलावांमध्ये भाविक भक्ती भावाने गणोश मूर्तीचे तसेच देवींच्या मूर्तीचे विसर्जन करतात पण त्याचबरोबर या तलावात प्लास्टिक पिशव्यात भरून निर्माल्यही टाकले जाते. दरम्यान माघी गणेशोत्सवला अवघे तीन दिवस राहीले असतानाही ज्याठिकाणी विसर्जन केले जाते त्या तलावांच्या स्वछतेला मनपाला मुहूर्त मिळालेला नाही.

शहरी भाग असो वा ग्रामीण भाग यामधील तलाव हे कल्याण डोंबिवलीतील पाणीपुरवठयाचे एकेकाळी मुख्य स्त्रोत होते. पण आता तलाव डंपिंग ग्राउंड ठरली आहेत. प्लास्टिक पिशव्या, कचरा, पुजेचे साहित्य टाकण्याचे एकमात्र ठिकाण म्हणून त्यांची ओळख आहे. गणेशोत्सवाच्या धर्तीवर कृत्रिम तलाव महापालिकेकडून बनवले जातात, पण आजही सर्वाधिक पसंती ही नैसर्गिक तलावांना मिळते परंतु या तलावांच्या स्वछतेचा प्रश्न हा कायमच उदभवत असतो. गणोशोत्सव असो अथवा  नवरात्रौत्सव या उत्सवापूर्वी ही स्वछता व्हावी अशी मागणी स्थानिक नागरीकांकडून होत असते. परंतु ही स्वछता उत्सवकाळापुरतीच मर्यादित राहते आणि उत्सव संपताच तलावाच्या देखभालीकडे सर्रास  दुर्लक्ष होते. महापालिकेच्या वतीने तलावांच्या अवतीभवती निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. 

तरीही नागरिकांकडून निर्माल्य हे बिनदिककतपणे तलावात टाकले जाते. काही ठिकाणच्या तलावांची पाहणी केली असता हे चित्र आवजरुन दिसून येते. कल्याणमधील आधारवाडी तलावात मोठया प्रमाणात शेवाळ आणि जलपर्णी असून तलावाला डंपिंगचे स्वरूप आले आहे. डोंबिवलीतील खंबाळपाडा तलावाच्या स्वच्छतेकडेही दुर्लक्ष झाले आहे. काठावर जलपर्णी साचल्याचे दिसत आहे. डोंबिवली शहरात ज्याठिकाणी मोठया प्रमाणात गणेश मुर्त्यांचे. विसर्जन होते त्या चोळेगावातील तलावाच्या स्वच्छतेलाही अजून मुहुर्त मिळालेला नाही. 

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMaghi Ganesh Jayantiमाघी गणेश जयंती