शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

‘सारथी’चा १००० कोटींचा निधी लवकर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:17 AM

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकारकडे केलेल्या सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी म्हणून राज्य सरकारने ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकारकडे केलेल्या सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेले एक हजार कोटींचा निधी ‘सारथी’साठी लवकरात लवकर द्यावा, अशी विनंतीवजा सूचना खासदार संभाजीराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी केली.

आमच्या मागण्या मान्य करण्याकरिता आम्ही एक महिन्याची मुदत दिली होती. ती संपण्याआधी सरकारने यात लक्ष घालावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो एक हजार कोटींचा निधी देण्याचे मान्य केले आहे. परंतु तो कसा देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा किती देणार जाहीर करावे, असे संभाजीराजे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमचे मूक आंदोलन संपलेले नाही याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

‘सारथी’ची बोर्ड मिटिंग अद्याप झालेली नाही. दि. १४ जुलै रोजी ती होत आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, असे सांगून संभाजीराजे यांनी सांगितले की, सारथीचे कोल्हापुरात उपकेंद्र सुरू झाले तसेच ते नाशिक, संभाजीनगर, नांदेड येथेही होणार आहे. जागा तयार आहेत. त्यामुळे ही केंद्रेही लवकर सुरू व्हावीत, अशी अपेक्षा आहे. कोल्हापूरचे केंद्र सारथीचे मुख्य केंद्र झाले तर स्वागतच आहे.

सारथीचे पुनर्रस्थापना, त्याची स्वायत्तता आणि त्याची उपकेंद्रे या मागण्या मान्य झाल्या आहेत. राहिला प्रश्न तो निधीचा. अजित पवार यांनी लवकरच जाहीर करावा. त्यामुळे कामे सुरू होतील. निधीबाबत जरुर पडली तर मी स्वत: अजित पवार यांच्याशी बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठ्यांना सामाजिक मागास असल्याचे सिध्द झाले तरच आरक्षण मिळणार आहे. पण आजच्या घडीला मराठा समाज उच्च, प्रगत असल्याने आरक्षण मिळू शकणार नाही. म्हणूनच मी दोन पर्याय सुचविले आहेत. ३३८ ब च्या माध्यमातून मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याबरोबरच राज्यपालांमार्फत ३४२ अ प्रमाणे केंद्र सरकार व राष्ट्रपती यांच्याकडे प्रस्ताव पाठविणे हेच पर्याय आहेत. दोन्ही गोष्टी समांतर पध्दतीने सुरू ठेवल्या पाहिजेत, असे संभाजीराजेंनी सांगितले.

सारखी तलवार कशाला उगारायची?

मागण्याबाबत विलंब झाला तर आंदाेलन तीव्र करणार का? असे विचारता संभाजीराजे म्हणाले, केव्हा आवाज टाकायचा, दबाव टाकायचा मला कळतंय. ज्या छत्रपती घराण्यात जन्मलो म्हणून सारखी तलवार उगारायची काय गरज आहे? सामंजस्याने बोलून कामा होत आहे. प्रश्न संवादातून सुटत आहेत. एक महिन्याची मुदत दिली असली तर आणखी काही दिवस थांबलो तर काहीच फरक पडणार नाही.