शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

Kolhapur: राधानगरी अभयारण्यात ११ पाणवठे प्राण्यांसाठी वरदान, वाघासह बिबट्यांचे अस्तित्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 11:59 IST

नवीन पाच पाणवठे उभारणार

सागर चरापलेफुलेवाडी : दाजीपूर, राधानगरी अभयारण्यात बनविलेले ११ कृत्रिम पाणवठे उन्हाळ्यात वन्यजिवांसाठी उपयुक्त ठरत आहेत. गेल्या काही वर्षांपासून उन्हाचा तडाका वाढल्याने वन्यजिवांना पाण्याची कमतरता जाणवत होती, यासाठी वन्यजीव विभागाने जंगलात बोअरवेल मारून केलेली पाण्याची व्यवस्था प्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. यामुळे या प्राण्यांना त्यांच्या अधिवासातच पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे.

दाजीपूर अभयारण्यातील या अकरा पाणवठ्यात सुरुवातीला बोअर मारण्यात आले आहे. बोअरचे पाणी उपसण्यासाठी सोलर मोटर बसविली आहे. मोटर ऑटो असल्याने केव्हाही मोबाईलवरून चालू करण्यात येते. ते पाणी थेट पाणवठ्यामध्ये सोडले आहे. त्यामुळे प्राण्यांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत नाही.पाणवठ्यांची संख्या जास्त असल्याने तेथे प्राण्यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे पर्यटनासाठी दाजीपूर अभयारण्यात जाणाऱ्या पर्यटकांनाही वन्यजिवांचे दर्शन होत आहे. कोल्हापूर परिक्षेत्र वन्यजीव विभागाने पुन्हा पाच नवीन पाणवठ्यांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला सादर केला आहे. त्याला निधी मिळाल्यास हे नवे पाणवठे या वन्यजिवांची तहान भागविणार आहेत.

वन्यजिवांना अभयदाजीपूर अभयारण्यात एक वाघ, २० बिबट, ३० रान कुत्री, अस्वले यांचा अधिवास आहे. गव्यांना या अभयारण्यात संरक्षण आहे. जंगलातील मानवी हस्तक्षेपामुळे अभयारण्यातील वन्यप्राणी बेधडक मानवी वस्तीत फिरत आहे.

वन्यजिवांच्या अधिवासानुसार पाणवठे तयार केले आहेत. त्यांना उन्हाळ्यात जंगलाबाहेर फार वणवण न करता पाणी मिळणार आहे. या पाणवठ्यांमुळे कॅमेऱ्याद्वारे वन्यजिवांच्या हालचाली टिपण्यासही मदत होत आहे. - श्रीकांत पवार, विभागीय वनाधिकारी, वन्यजीव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलAnimalप्राणी