शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
2
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
3
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
4
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
5
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
6
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
7
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
8
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
9
बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत
10
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
11
'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं
12
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
13
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
14
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
15
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
16
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
17
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
18
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
19
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
20
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."

कोर्टाची पायरी न चढता सावरले १२२ संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:41 AM

नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केवळ समज-गैरसमजांमुळे तुटण्यापर्यंत आलेले संसार महिला बालविकास विभागाच्या सखी वन स्टॉप ...

नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केवळ समज-गैरसमजांमुळे तुटण्यापर्यंत आलेले संसार महिला बालविकास विभागाच्या सखी वन स्टॉप उपक्रमामुळे सावरू लागले आहेत. जिल्ह्यात गेल्या सात महिन्यात तब्बल १२२ जणींची संसारवेल पुन्हा बहरली आहे. विशेष म्हणजे आलेल्या १३० तक्रारींपैकी १२२ तक्रारी या कोर्टाची पायरी न चढता केवळ समुपदेशनाने सुटल्या आहेत.

महिलांवरील अन्याय, अत्याचाराची कुठेही जाहीर वाच्यता न करता त्याच्या सोडवणुकीसाठी म्हणून एकाच छताखाली समुपदेशन, वैद्यकीय, न्यायालयीन बाबी याव्यात म्हणून राज्य सरकारने ‘सखी वन स्टॉप’ या नावाने उपक्रम सुरू केला. सुरुवातीपासूनच याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरात विचारेमाळ येथे १६ खोल्यांच्या कार्यालयात केंद्राचे काम चालते. १४ कर्मचाऱ्यांचा स्टाफ मंजूर आहे, पण सध्या १० जण कार्यरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम चालणाऱ्या या केंद्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पाचगावमधील आनंदीबाई बहुउद्देशीय महिला संस्थेकडे दिली आहे.

चौकट ०१

लॉकडाऊन काळात तक्रारींत वाढ

लॉकडाऊन काळात तक्रारींचे प्रमाण वाढले. आलेल्या १३० पैकी तब्बल ९९ तक्रारी या लॉकडाऊन काळात आणि त्याही पती-पत्नीच्या वादाच्याच होत्या. या काळात बाहेर जाता येत नसल्याने ‘सखी वन स्टॅाप केंद्रा’ने यु ट्यूब, फेसबुक, व्हाॅटस ॲपसारख्या समाजमाध्यमासह फोनवरूनही संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यावर महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि या सर्व तक्रारींचे फोनवरच निराकरणदेखील झाले हे जास्त मोलाचे.

चौकट ०२

केंद्राकडे आलेल्या १३० पैकी १२२ तक्रारींचे निराकरण झाले आहे. ७ तक्रारींची कार्यवाही सुरू आहे. एक तक्रारदाराची वैद्यकीय चाचणी झाली आहे. उर्वरीत तक्रारी केवळ समुपदेशाने सुटल्या आहेत.

चौकट ०३

काय असते तक्रारीचे स्वरूप

पतीकडून मारहाण, कुटुंबीयांशी न पटणे, आर्थिक विवंचना, नवऱ्याचे व्यसन, जवळच्या नातेवाईकांकडून अत्याचार, विनयभंग

प्रतिक्रिया

महिलेवर अन्याय, अत्याचार होत असेल तर तिने व्यक्त व्हावे यासाठी या केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरते. तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेणे, जास्तीत जास्त नाते सावरण्याचा प्रयत्न करण्यावर भर दिला जातो, अगदीच टोकाचे असेल तरच कोर्टाकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. आम्ही गेल्या सात महिन्यांतही एकही केस कोर्टापर्यंत पोहोचू दिलेली नाही.

वैशाली महाडिक, अध्यक्षा, आनंदीबाई महिला संस्था