शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

कोल्हापूर: माणगांवमध्ये आगीचे सञ सुरूच, १६ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी; शेतकरी भयभयीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 5:35 PM

माणगांव ग्रामपंचायतीने या प्रकाराची घेतली गंभीर दखल

अभय व्हनवाडेरूकडी-माणगाव: माणगांव येथील  सरळी नामक शेतातील २५ एकर उसाला रविवारी (दि ३०) आग लागल्याची घटना ताजी असताना आज, मंगळवारी पुन्हा १६ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाले. आगीच्या प्रकारामुळे शेतकरी भयभयीत झाले आहेत. विनाकारण ऊसाना आगी लावण्याच्या सञामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट आहे.हंगाम सुरु झालेला असतानाच ऊसाला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्यातच अदयाप सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने उस कोठे द्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यातच परतीच्या पाऊसामुळे जमिनीत ओलावा असल्याने शेतातून ट्रक्टर ट्रॉली बाहेर काढण्यासाठी कसरत सह नुकसानीचे ठरत आहे. कारखाना घोषित  केलेल्या दरामध्ये जळीत उसाला टनामागे ४०० ते ५०० रूपये कमी दर मिळत असल्याने उत्पादकाचे लाखोंचे  नुकसान होत आहे.दरम्यान, माणगांव ग्रामपंचायतीने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने उसतोडीनंतर पाला पेटवून इतर शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार राहणाऱ्या गुन्हेगाराची गोपनीयरीत्या माहिती पोलीस स्टेशनला कळविण्यात येणार आहे. तसेच नुकसान भरपाई मिळावे यासाठी ग्राहक न्यायालय, राज्य वीज नियमक आयोगसह उच्य न्यायालयाकडे नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यात येणार असून पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती प्रसिध्दीपञकाद्वारे दिली आहे. या प्रसिध्दी पञकावर सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदारसह ग्रामपंचायत  सदस्यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग