शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

पाच रुपयांमध्ये मिळणार वीस लिटर शुद्ध पाणी- जिल्ह्यातील ५१ गावांमध्ये ‘वॉटर एटीएम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 01:13 IST

केवळ एक रुपयामध्ये एक लिटर आणि पाच रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी देणारे प्रकल्प कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उभारले जात आहेत

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेकडून प्रकल्प उभारणी

समीर देशपांडे ।

कोल्हापूर : केवळ एक रुपयामध्ये एक लिटर आणि पाच रुपयांमध्ये २० लिटर शुद्ध पाणी देणारे प्रकल्प कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या वतीने उभारले जात आहेत. ५१ गावांमध्ये ७१ ठिकाणी हे प्रकल्प उभारले जात असून, सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा नियोजन समितीमधून यासाठी निधी देण्यात आला आहे.

अनेक गावांमध्ये विविध कारणांनी पाणी दूषित होत असल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी ही योजना आखण्यात आली असून, या प्रकल्पांची उभारणी करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या यांत्रिकी विभागाकडे देण्यात आले आहे.

सामाजिक न्याय विभागाने यासाठी २०१७/१८ साली २ कोटी २ लाख; तर जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून ३७ गावांमधील अनुसूचित जाती जमाती वस्तींमध्ये ५२ ठिकाणी; तर नियोजनच्या निधीतून १४ गावांमध्ये १९ ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्या गावामधील किंवा वस्तीमधील १०० चौरस फुटांची जागा, पाणीपुरवठा आणि विजेची सोय उपलब्ध झाल्यानंतर तेथे या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. एका प्रकल्पासाठी ३ लाख ३ हजार रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे.

या प्रकल्पातून प्रतितास २५० लिटर शुद्ध पाणी मिळणार असून १ लिटरसाठी एक रुपया आणि २० लिटरसाठी पाच रुपयांचे नाणे या यंत्रामध्ये टाकावे लागणार आहे. यातून जे पैसे जमा होणार आहेत, ते यंत्रणा उभारणाºया ठेकेदाराला दिले जाणार असून त्यांच्या कंपनीनेच तीन वर्षे या प्रकल्पाची देखभाल करायची आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्यायचे उपायुक्त बाळासाहेब कामत, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जात असल्याचे ‘यांत्रिकी’चे उपअभियंता उत्तम थोरात यांनी सांगितले.या गावांना लाभशिरोळ : धारवाड, घालवाड, लाटवाडी, शिरदवाड, हेरवाड, तमदलगे, खिद्रापूर, तेरवाड.हातकणंगले : खोतवाडी, तारदाळ, लक्ष्मीवाडी, आळते, नेज, रेंदाळ, नरंदे, घुणकी, कबनूर, कोरोची, चावरे.करवीर : कणेरी, दिंडनेर्ली, गडमुडश्ािंगी, वळीवडे, वसगडे, निगवे खालसा, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव, चिंचवाड.आजरा : चाफवडे, सातेवाडी, वडकशिवाले, लाटगाव, सोहाळे, मलिग्रे.गडहिंग्लज : बड्याचीवाडी, कडगाव, कौलगे, कवळीकट्टी, दुंडगे, नेसरी.भुदरगड : खानापूर, कोळवण, भाटिवडे.चंदगड : सरोळी, गवसे.कागल : साके,सिद्धनेर्लीराधानगरी : सावर्डे, पाटणकर.पन्हाळा : पडळ, मसूदमालेयातील काही गावांमध्ये जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांनी हा प्रकल्प नको असे लिहून दिले आहे.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद