शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

ओबीसीत समाविष्ट जातींच्या पुनर्विलोकनावर २६ला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 3:46 PM

'मागास वर्ग आयोगाच्या कायद्यानुसार मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी या यादीत समाविष्ट असलेल्या अन्य प्रगत जातींना यादीतून वगळावे'

कोल्हापूर : मागासवर्ग आयोग कायदा २००५ मधील कलम ९ व ११ नुसार ओबीसी यादीतील समाविष्ट ३४२ जातीचे पुनर्विलोकन करा, यातील प्रगत जातींना बाहेर काढा असे झाले तरच मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे. याबाबत आयोगाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी केली. यावर आयोगाचे सदस्य निवृत्त न्यायाधीश ॲड. चंद्रलाल मेश्राम व ॲड. बी. सी. सगर-किल्लारीकर यांनी २६ तारखेच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी लढा देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.मागास वर्ग आयोगाच्या कायद्यानुसार मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी या यादीत समाविष्ट असलेल्या अन्य प्रगत जातींना यादीतून वगळावे लागणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे निमंत्रक दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, वसंतराव मुळीक यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त विशाल लोंढे उपस्थित होते.आयोगाच्या सदस्यांनी यावेळी सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना २६ मे रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रित केले. आयोगाचे अध्यक्ष, सदस्य व मंत्र्यांच्या संयुक्त बैठकीत मराठा समाजाने भावना मांडाव्यात. त्यावेळी कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी सुनीता पाटील, चारुशीला पाटील, चंद्रकांत पाटील, राजू लिंग्रस, संजय काटकर, अमरसिंह निंबाळकर, रुपेश पाटील उपस्थित होते.

आयोग राजकारण्यांच्या हातची बाहुली : ॲड. इंदुलकरयावेळी ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, इम्पिरिकल डेटा नसल्याचे कारण सांगून आजवर मराठा आरक्षण डावलले गेले. ते सर्वोच्च न्यायालयात टिकवायचे असेल तर मागासवर्ग आयोगाने कलम ९ व ११ ची कार्यवाही केली पाहिजे. पण हे आयोग म्हणजे राजकारण्यांच्या हातची बाहुली आहे. नेत्यांना आपल्या मतांचा गठ्ठा कमी करायचा नसल्याने ते हा निर्णय घेणार नाहीत. पण आता मराठा समाज कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लढा देईल.

अडचणींचा पाढा..यावेळी आयोगाच्या सदस्यांनीच आपल्यासमोरील अडचणींचा पाढा वाचला. आयोगाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत, शासन आमचे ऐकत नाही, आमच्या ठरावांवर निर्णय घेत नाही, कायद्यांची अंमलबजावणी केली जात नाही. नागरिकांकडून आलेली पत्रे उघडण्यासाठीसुद्धा स्टाफ नाही, क्लर्क नाही अशा अडचणी सांगितल्या. त्यामुळे ज्यांच्याकडे दाद मागावी तेच अडचणीत असल्याचे बैठकीत दिसले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण