शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट वाटला छान; कोल्हापुरातील तीसजणांचे बाद झाले कान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 1:08 PM

बांबवड्याच्या दोघांचे कायमस्वरूपी ऐकणे झाले बंद

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीतील दणदणटामुळे कोल्हापूर शहर आणि आसपासच्या ३० हून अधिक तरुणांचे कान बाद झाले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील दोघांना ऐकू येणे कायमस्वरूपी बंद झाले आहे. आता याबाबत सर्व डॉक्टरांकडून माहिती संकलित करण्याचा निर्णय कान, नाक, घसातज्ज्ञांच्या संघटनेने घेतला आहे.विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी यंत्रणा हा आता चिंतेचा विषय झाला आहे. लेझरमुळे काही जणांच्या डोळ्यांतून रक्त आल्यामुळे नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर बंदी आणली होती; परंतु रात्री १२ ला जरी ध्वनी यंत्रणा बंद झाली असली तरी त्याआधी तरुण मंडळांनी एकावर एक थर चढवत आपली आवाजाची हौस भागवून घेतील होती; परंतु यामध्ये अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांचेच कान बाद झाले आहेत.

बांबवडेजवळील पाटणे येथील एक युवक कानाला ऐकू येईनासे झाल्यानंतर १२ तासांत डॉक्टरांकडे आला. त्याच्या पडद्याला इंजेक्शन देण्यात आले आणि त्यातून त्याला ५० टक्के ऐकू येऊ लागले; परंतु दुसरा इंजिनिअर असलेला २१ वर्षांचा युवक दोन दिवसांनी डॉक्टरांकडे आला. त्यामुळे उपचारावर मर्यादा आल्याने त्याला दोन्ही कानांनी ऐकू येणे बंद झाले आहे. तो ध्वनी यंत्रणेला पाठ लावून बसला होता. बांबवडे येथील तिसऱ्या युवकाची ऐकण्याची क्षमता ६० टक्क्यांनी कमी झाली आहे.अधिक माहिती घेतली असता कोल्हापूरमधील एका कानाच्या डॉक्टरकडे हे दहाजण दाखल झाले होते. असे ३५ जण शहरात असून आता त्यांच्याकडून कोणाच्या दवाखान्यात कितीजण दाखल झाले होते, याची माहिती घेतली जात आहे. संघटनेने हा उपक्रम हातात घेतला असून, त्या आकडेवारीच्या आधारे जनजागरण करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डॉ. राजश्री माने आणि डाॅ. अजित लोकरे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील संख्याही अधिकमोठी ध्वनी यंत्रणा केवळ शहरात लावली जाते हा गैरसमज आहे. दाखल १० रुग्णांपैकी सातजण हे ग्रामीण भागातील आहेत. यामध्ये वाघापूर (ता. भुदरगड), हासूर दुमाला (ता. करवीर), कळे सातवे (ता. पन्हाळा) यांचा समावेश आहे. तसेच कोल्हापूर शहरातील फुलेवाडी, अयोध्या कॉलनी येथील युवकांचा एक कान बरा असून, दुसऱ्या कानाची ऐकण्याची क्षमता ५० टक्क्यांहून कमी झाली आहे.

नेहमीपेक्षा कानावर मोठा आवाज आणि तो अधिक काळ आदळला तर त्यामुळे कानाच्या पडद्याला दुखापत होते. संबंधित व्यक्ती जर २४ तासांत डॉक्टरकडे आली तर इंजेक्शन देऊन उपचार करता येतात. २४ तासांपेक्षा अधिक काळ झाला तर मात्र उपचारावर मर्यादा येतात. माझ्याकडे आलेले बहुसंख्य रुग्ण मिरवणूक झाल्यानंतर तीन, चार दिवसांनी आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करताना मर्यादा आल्या आहेत. - डॉ. वासंती पाटील, कर्ण उपचार तज्ज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४doctorडॉक्टर