शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट वाटला छान; कोल्हापुरातील तीसजणांचे बाद झाले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:09 IST

बांबवड्याच्या दोघांचे कायमस्वरूपी ऐकणे झाले बंद

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीतील दणदणटामुळे कोल्हापूर शहर आणि आसपासच्या ३० हून अधिक तरुणांचे कान बाद झाले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील दोघांना ऐकू येणे कायमस्वरूपी बंद झाले आहे. आता याबाबत सर्व डॉक्टरांकडून माहिती संकलित करण्याचा निर्णय कान, नाक, घसातज्ज्ञांच्या संघटनेने घेतला आहे.विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी यंत्रणा हा आता चिंतेचा विषय झाला आहे. लेझरमुळे काही जणांच्या डोळ्यांतून रक्त आल्यामुळे नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर बंदी आणली होती; परंतु रात्री १२ ला जरी ध्वनी यंत्रणा बंद झाली असली तरी त्याआधी तरुण मंडळांनी एकावर एक थर चढवत आपली आवाजाची हौस भागवून घेतील होती; परंतु यामध्ये अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांचेच कान बाद झाले आहेत.

बांबवडेजवळील पाटणे येथील एक युवक कानाला ऐकू येईनासे झाल्यानंतर १२ तासांत डॉक्टरांकडे आला. त्याच्या पडद्याला इंजेक्शन देण्यात आले आणि त्यातून त्याला ५० टक्के ऐकू येऊ लागले; परंतु दुसरा इंजिनिअर असलेला २१ वर्षांचा युवक दोन दिवसांनी डॉक्टरांकडे आला. त्यामुळे उपचारावर मर्यादा आल्याने त्याला दोन्ही कानांनी ऐकू येणे बंद झाले आहे. तो ध्वनी यंत्रणेला पाठ लावून बसला होता. बांबवडे येथील तिसऱ्या युवकाची ऐकण्याची क्षमता ६० टक्क्यांनी कमी झाली आहे.अधिक माहिती घेतली असता कोल्हापूरमधील एका कानाच्या डॉक्टरकडे हे दहाजण दाखल झाले होते. असे ३५ जण शहरात असून आता त्यांच्याकडून कोणाच्या दवाखान्यात कितीजण दाखल झाले होते, याची माहिती घेतली जात आहे. संघटनेने हा उपक्रम हातात घेतला असून, त्या आकडेवारीच्या आधारे जनजागरण करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डॉ. राजश्री माने आणि डाॅ. अजित लोकरे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील संख्याही अधिकमोठी ध्वनी यंत्रणा केवळ शहरात लावली जाते हा गैरसमज आहे. दाखल १० रुग्णांपैकी सातजण हे ग्रामीण भागातील आहेत. यामध्ये वाघापूर (ता. भुदरगड), हासूर दुमाला (ता. करवीर), कळे सातवे (ता. पन्हाळा) यांचा समावेश आहे. तसेच कोल्हापूर शहरातील फुलेवाडी, अयोध्या कॉलनी येथील युवकांचा एक कान बरा असून, दुसऱ्या कानाची ऐकण्याची क्षमता ५० टक्क्यांहून कमी झाली आहे.

नेहमीपेक्षा कानावर मोठा आवाज आणि तो अधिक काळ आदळला तर त्यामुळे कानाच्या पडद्याला दुखापत होते. संबंधित व्यक्ती जर २४ तासांत डॉक्टरकडे आली तर इंजेक्शन देऊन उपचार करता येतात. २४ तासांपेक्षा अधिक काळ झाला तर मात्र उपचारावर मर्यादा येतात. माझ्याकडे आलेले बहुसंख्य रुग्ण मिरवणूक झाल्यानंतर तीन, चार दिवसांनी आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करताना मर्यादा आल्या आहेत. - डॉ. वासंती पाटील, कर्ण उपचार तज्ज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४doctorडॉक्टर