शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
5
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
6
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
7
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
8
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
9
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
10
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
11
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
12
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
14
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
15
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
16
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
17
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
18
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
19
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
20
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

पुनर्विकासातून ३० हजार अद्ययावत घरे, कोल्हापूरच्या प्रगतीला बळ; बांधकाम क्षेत्राची गती वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 12:52 PM

तीस वर्षांपूर्वीच्या इमारतींचा पुनर्विकास करणे उपयुक्त ठरणार

संतोष मिठारीकोल्हापूर : सध्या कोल्हापूर शहरात तीस वर्षांपूर्वीच्या सुमारे एक हजार इमारती आहेत. त्यांचा पुनर्विकास साधल्यास अनेक गरजूंचे गृहस्वप्न तर साकारणार आहे, त्यासह बांधकाम क्षेत्राला गती मिळून कोल्हापूरच्या प्रगतीला बळ मिळणार आहे.या इमारतींच्या पुनर्विकासातून अद्ययावत ३० हजार नवीन घरे उपलब्ध होणार आहेत. कोरोनाने प्रत्येकाला स्वत:च्या घराचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे अनेकांची सध्या घरखरेदीच्या दिशेने पावले पडत आहेत. त्यामुळे कोल्हापुरातही घरांची मागणी वाढत आहे. महापुराचे पाणी येणाऱ्या परिसरात जागा उपलब्ध आहे. त्या ठिकाणी गृहस्वप्न साकारण्यास नागरिक नकार देत आहेत.त्याऐवजी पुराचे पाणी येत नसलेल्या राजारामपुरी, टाकाळा, माळी कॉलनी, प्रतिभानगर, साने गुरुजी वसाहत, हॉकी स्टेडियम आदी परिसराला ते प्राधान्य देत आहेत. त्याठिकाणी नव्या जागा अपेक्षा इतक्या प्रमाणात उपलब्ध नसल्याची अडचण आहे. अशा स्थितीत या परिसरातील तीस वर्षांपूर्वीच्या इमारतींचा पुनर्विकास करणे उपयुक्त ठरणार आहे.सध्या यातील अधिकतर इमारतींची दुरवस्था झाली आहे. तेथील रहिवासी असलेल्यांना त्या कमी पडत आहेत. त्यावर या इमारतींचा पुनर्विकास केल्याने त्यांना सध्याच्या क्षेत्रफळापेक्षा वाढीव क्षेत्रफळ, लिफ्ट, फायर सेफ्टी, कम्युनिटी स्पेस, पुरेसे पाणी आदी सुविधांसह अद्ययावत घरे मिळतील. त्यामुळे त्यांची जीवनशैली बदलण्यास मदत होईल. त्यासह या इमारतींमधील घरांची संख्या दुप्पट झाल्याने अनेक गरजूंचे गृहस्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे.महापालिकेच्या उत्पन्नात वाढ, बांधकाम क्षेत्राला गतीया इमारतींचा पुनर्विकासाने सध्या असलेल्या १५ हजार फ्लॅटची संख्या किमान ३० हजारांवर जाईल. त्यामुळे घरफाळा, पाणीपट्टी कराच्या माध्यमातून महापालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. नव्या घरांचे काम सुरू झाल्याने बांधकाम क्षेत्राला गती मिळेल. त्यातून रोजगार निर्मिती वाढण्यास हातभार लागणार आहे.

महापालिकेने चालना द्यावीजुन्या, जीर्ण झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने सवलती देण्याचा निर्णय सप्टेंबर २०१९ मध्ये घेतला आहे. त्यात दहा टक्के अधिकचे चटईक्षेत्र, आवश्यक रस्ते, शिघ्रगणकाच्या दराच्या ५० टक्के सवलतीच्या दराने टीडीआर देणे, प्रिमिअमचा भरण्याचे टप्पे ठरविणे आदी सवलतींचा समावेश आहे. त्यादृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेने पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देणे आवश्यक आहे.

 

  • शहरातील ३० वर्षांपूर्वीच्या इमारती : सुमारे एक हजार
  • या परिसरात आहेत इमारती : शिवाजी पार्क, माळी कॉलनी, टाकाळा, राजारामपुरी, शाहुपुरी, बेलबाग (मंगळवारपेठ)
  • पुनर्विकासातून नव्याने उपलब्ध होणारी घरे : ३० हजार

आमच्या रामसिना ग्रुपने आतापर्यंत शहरातील तीन जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. टाकाळा परिसरातील मनुस्मृती या चौथ्या प्रकल्पाची पायाभरणी आज, शुक्रवारी होणार आहे. शहरात सध्या तीस वर्षांपूर्वीच्या एक हजार जुन्या इमारती आहे. त्याचा पुनर्विकास होणे आवश्यक आहे. ते झाल्यास कोल्हापूरच्या विकासाला बळ मिळणार आहे. अनेकांचे अद्ययावत घराचे स्वप्न साकारणार आहे. एक सामाजिक बांधिलकीतून बांधकाम व्यावसायिकांनी पुनर्विकासाचा विचार करून कोल्हापूरच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे. -सचिन ओसवाल, एमडी, रामसिना ग्रुप 

तीस वर्षांपूर्वीच्या इमारतींची दुरवस्था झाली असून, तेथे राहणे धोकादायक ठरते. बदलत्या काळानुसार या इमारतींचा पुनर्विकास होणे आवश्यक आहे. त्यातून नवीन अद्ययावत घरे उपलब्ध होतील. त्यामुळे सध्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांबरोबरच कोल्हापूरच्या विकासाला हातभार लागणार आहे. - संजय आडके, आर्किटेक्ट

टॅग्स :kolhapurकोल्हापूर