शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

३१ कारखान्यांची धुराडी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2016 12:39 AM

विभागातील साखर हंगाम बंद : ‘कुंभी’, ‘शाहू’ दोन दिवसांत; तर ‘जवाहर’, ‘गुरुदत्त’ आठवड्यात संपणार

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील ३७ पैकी तब्बल ३१ सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम बंद झाला आहे. ‘कुंभी’, ‘शाहू’चा हंगाम येत्या दोन दिवसांत, तर ‘जवाहर’, ‘गुरुदत्त’ व ‘हुतात्मा’ या कारखान्यांची येत्या आठ दिवसांत धुराडी थंडावणार आहेत. पाऊस कमी झाल्याने उसाचे उत्पादन कमी मिळणार, असे आडाखे बांधत साखर कारखान्यांनी हंगामाची सुरुवात केली; पण उसाचे उत्पादन वाढत जाईल, तशी कारखान्यांची तारांबळ उडाली. उन्हामुळे शेवटच्या टप्प्यात उसाची उपलब्धता करताना सर्वच कारखान्यांच्या तोडणी यंत्रणेची दमछाक उडाली. गतवर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बहुतांश कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन दि. २५ मार्चपर्यंत हंगाम संपला होता; पण यावर्षी दि. १ नोव्हेंबरला हंगाम सुरू होऊन दि. २० मार्चपर्यंत १५, मार्चअखेर १०, तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ७ कारखाने बंद झाले. गतवर्षीपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात साधारणत: दहा लाख टन, तर सांगली जिल्ह्यात सव्वादोन लाख असे सव्वा बारा लाख टन उसाचे उत्पादन जादा झाले असून, विभागातून २ कोटी ७९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. उताऱ्यात ‘गुरुदत्त’चा दबदबा कायमसाखर उताऱ्यात ‘बिद्री’, ‘दालमिया’, ‘कुंभी’, ‘गुरुदत्त’ यांचाच वरचष्मा असतो; पण गेल्यावर्षी १३.३६ टक्के उतारा राखत ‘गुरुदत्त’ने आघाडी घेतली होती. यंदाही ‘गुरुदत्त’ने गळीत हंगामात १३.५३ टक्के उतारा ठेवून दबदबा कायम राखला आहे. सरासरी उतारा घटणारकोल्हापूर विभागाचा गतवर्षीचा सरासरी उतारा १२.५८ टक्के होता. त्यामध्ये कोल्हापूरचा १२.७७, तर सांगलीचा १२.२४ टक्के होता. यावर्षी कोल्हापूरचा १२.६०, तर सांगलीचा १२.०५ टक्के व विभागाचा सरासरी १२.४१ टक्के आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा उतारा घटण्याची शक्यता आहे.