शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

Kolhapur: ३१५ रुपयांचा मासिक पास, मग कसली ही टोल माफी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 3:36 PM

वाहनधारकांची विचारणा : किणी परिसरातील २० किलोमीटरच्या गावांना लाभ

कोल्हापूर : किणी टोलनाक्यावरून परिसरातील २० किलोमीटरच्या परिघातील ग्रामस्थांकडून एकही रुपया टोल घेतला जाणार नाही; परंतु यासाठीच्या मासिक पाससाठी जी प्रक्रिया आहे त्याचा व्यवस्थापन खर्च म्हणून महिन्याला ३१५ रुपये द्यावे लागणार आहेत. या मासिक पासच्या आधारे नागरिक येथून प्रवास करू शकतील. त्यांना वेगळा टोल नसेल असे स्पष्टीकरण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे कोल्हापूर येथील प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. दरमहा हा पास काढायचा असेल तर मग काँग्रेसच्या आंदोलनानंतर टोल माफ झाला असे कसे म्हणता येईल, अशी विचारणा वाहनधारक करत आहेत.आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवड्यात किणी टोलनाक्यावर रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल आणि अन्यायी टोल आकारणीबद्दल आंदोलन करण्यात आले हाेते. यावेळी आंदोलन मागे घेताना प्रकल्प संचालक पंदरकर यांच्या स्वाक्षरीने जे पत्र देण्यात आले होते त्यातील काही मुद्यांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याने त्यांच्याशी संपर्क साधून हे स्पष्टीकरण घेण्यात आले.पंदरकर म्हणाले, पाऊस कमी आल्यामुळे खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत ही दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील. टोलमध्ये ५० टक्के सवलतीचा मुद्दा आंदोलकांनी मांडला होता. यातील २५ टक्के टोलमाफी रस्त्याचे काम जेव्हा सुरू केले तेव्हापासून सुरूच आहे. हे काम सुरू होण्याआधी ९० रुपये टोल होता. तो गेले वर्षभर ७० रुपये आहे. आणखी २५ टक्के टोलमाफीसाठी केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे.ते म्हणाले, मासिक पासबाबत काही गैरसमज झाले आहेत. २० किलोमीटरच्या परिघातील गावांतील वाहनांना टोलमाफी कायद्यानुसार देण्यात आली आहे; परंतु मासिक पाससाठी संबंधित बँक, पास प्रक्रिया यासाठी महिन्याला ३१५ रुपये देऊन पास घ्यावा लागणार आहे. त्यामुळे टोलमाफी असली तरी प्रक्रिया शुल्क म्हणून ३१५ भरून मासिक पासचे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे.

आधार कार्ड हवेच जर..ज्यांचे आधार कार्ड किणी टोलनाक्याच्या परिघातील २० गावांतील आहे अशांनाच या टोलमाफीचा फायदा मिळणार आहे. अन्य ठिकाणचे आधारकार्ड असेल तर परिघातील गावांतील एखादा नागरिक असला तरी त्यांना पास देता येणार नाही. हा जर नियम असेल तर मग प्राधिकरण आधार कार्ड पाहूनच टोलमध्ये सवलत का देत नाही..? त्यासाठी दरमहा वेगळा पास काढण्याची काय गरज आहे? असेही या परिसरातील लोक विचारू लागले आहेत.

टोलनाक्यावरच होणार पासचे नूतनीकरणप्रत्येक महिन्याला जो पास देण्यात येणार आहे, त्याचे नूतनीकरण दर महिन्याला करावे लागणार आहे. याचा त्रास सर्वसामान्यांना होणार नाही का? अशी विचारणा केली असता, या पासचे नूतनीकरण टोलनाक्यावरच काही मिनिटांमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtollplazaटोलनाका