शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कोल्हापुरातील ४५ हजार हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली; 'या' तालुक्यांना अधिक फटका

By राजाराम लोंढे | Published: July 29, 2023 11:51 AM

शेतकरी हवालदिल

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यात गेली आठ-दहा दिवस एकसारखा पाऊस कोसळत असल्याने सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले आहे. नदीकाठावरील ऊस, भातपिके पाण्याखाली गेली असून सर्वाधिक फटका ऊस शेतीला बसणार आहे. तब्बल ४५ हजार हेक्टरवरील ऊस पीक गेली आठ-दहा दिवस पाण्याखाली असल्याने उसाच्या शेंड्यात पाणी व माती गेल्याने कुजण्याची प्रक्रिया वेगाने होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.जिल्ह्यात १८ जुलैपासून पावसाने जोर धरला आहे. गेली दहा दिवस एकसारखा पाऊस सुरू आहे. पंचगंगेसह इतर नद्यांवरील ७२ हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सर्वच नद्यांचे पाणी परिसरातील शेतीत घुसले आहे. ऊस, भातपिके पाण्याखाली गेली आहेत. गेले आठ दिवस उसाचे पीक पाण्याखाली बुडाल्याने नुकसान होणार आहे. याचा सर्वाधिक फटका शिरोळ, हातकणंगले व करवीर तालुक्यांना अधिक बसणार आहे.

पूर्ण बुडालेल्या उसाला असा फटका बसतो

  • उसाच्या शेंड्यात गाळमिश्रित ओल्या चिखलाचा थर बसल्याने कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते.
  • ऊस शेंड्याकडून खाली वाळत जातो.
  • पाण्यात बुडालेल्या कांड्याना मुळ्या फुटतात.
  • उसाला पांगशा फुटू लागतात.
  • पांगशा फुटलेला ऊस पोकळ होतो.
  • पुराच्या पाण्यात आठ दिवसांपेक्षा अधिक ऊस राहिल्यास ८० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. 

पूर ओसरल्यानंतर शेतकऱ्यांनी हे करावे.

  • शिवारात साठलेले पाणी चराद्वारे बाहेर काढा.
  • उसाला पांगशा फुटल्यानंतर ऊसतोड होईपर्यंत त्या काढाव्यात.
  • ऊस कुजून वाळला तर ऊस जमिनीलगत कोयत्याने तोडून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरावा.
  • पूरबुडीत उसावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असतो.

 

उसाचे शेंडे आठ-दहा दिवस पाण्याखाली राहिले तर कुजून वाळण्याची प्रक्रिया वेगाने होते. सर्वच नद्यांची पातळी गेले आठ दिवस स्थिर राहिल्याने धोका अधिक आहे. - डॉ. अशोक पिसाळ, सहयोगी संशोधन संचालक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरFarmerशेतकरी