शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

Kolhapur: खडकाळ माळरानात १५ गुंठ्यांत ४५ टन उसाचे उत्पादन, लाटवडे येथील युवा शेतकऱ्याची किमया 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 5:42 PM

आयुब मुल्ला खोची: पाणी अन् मशागतीचं व्यवस्थापन वेळच्या वेळी करीत खडकाळ माळरानात १५ गुंठ्यांत ४५ टन उसाचे उत्पादन काढण्याची ...

आयुब मुल्लाखोची: पाणी अन् मशागतीचं व्यवस्थापन वेळच्या वेळी करीत खडकाळ माळरानात १५ गुंठ्यांत ४५ टन उसाचे उत्पादन काढण्याची किमया हातकणंगले तालुक्यातील लाटवडे येथील युवा शेतकरी शरद विष्णू पाटील यांनी केली आहे. इलेक्ट्रॉनिक साहित्याची विक्री दुरुस्ती करणारा मिस्त्री शेतीचा पोत सुधारून ऊस शेतीला सुध्दा फायद्यात आणण्यात यशस्वी ठरला आहे.शरद पाटील इलेक्ट्रॉनिक्स विषयातून आयटीआय शिक्षण उत्तीर्ण झालेला आहे. टिव्ही दुरुस्त करण्यात त्याचा हातखंडा आहे. हा व्यवसाय करीत त्याने शेतीत उसाचे उत्पन्न अधिकचे घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. खडकाळ जमिनीत विक्रमी उत्पन्न काढण्याचा त्याने चंग बांधला. १५ गुंठयाची जमीन तयार केली. उभी नांगरट केल्यानंतर चार ट्रॉली शेणखत टाकले. त्यांनतर आडवी नांगरट केली. ८६०३२ उसाची दोन डोळे पद्धतीने गेल्या वर्षीच्या जून मध्ये लागण केली. खरीप हंगाम असल्याने त्यामध्ये आंतरपीक म्हणून भुईमूग टोकणला. ड्रिप बरोबरच पाट पाण्याची सोय केली. दोन्ही पिके दमदार आली. सहा क्विंटल शेंगा झाल्या.पानांची रुंदी उसाच्या पेऱ्याची जाडी वाढण्यासाठी दोन वेळा फवारणी व आळवणी केली. रोगाचा प्रादुर्भाव होवू नये याची काळजी घेतली. दहा फूट अंतरात सुमारे ५५ ते ६० उसाची संख्या होती. ४५ कांडीचा लांबलचक भरभक्कम तयार झाला. तोडताना त्याचे तीन ते चार कंडके करूनच मोळी बांधावी लागली. ऊस वारणा व शरद कारखान्याला गळीतासाठी पाठविला. त्याचे वजन ४५ टन २४५ किलो झाले. चाळीस हजार रुपयांचा एकूण खर्च वजा जाता १ लाख ४ हजार रुपये व शेंगाचे असे सव्वा लाखाचे उत्पन्न यातून मिळाले. यासाठी सचिन पाटील (भादोले),नितीन देशमुख(कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसFarmerशेतकरी