शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

४७ वर्षाची प्रतिक्षा संपली ; ते सातबारे अखेर बुरंबाळी ग्रामस्थांच्या हाती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 14:47 IST

Dam Satbara Kolhapur- 'लोकमतने ' बुरंबाळी धरणग्रस्त सातबाराच्या प्रतीक्षेत या मथळ्याखाली काल वृत्त प्रसारित करून प्रशासनाला जागे केले. त्यानंतर काल पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून आजच्या आज सातबारे तयार करा असे सुनावले. रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यानी ऑफिसमध्ये थांबून हे सातबाऱ्याचे काम पूर्ण केले.

ठळक मुद्दे४७ वर्षाची प्रतिक्षा संपली ; ते सातबारे अखेर बुरंबाळी ग्रामस्थांच्या हाती !ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण ;फटाक्यांची आतषबाजी

श्रीकांत ऱ्हायकरधामोड : बुरंबाळी व नऊ नंबर ( ता. राधानगरी ) येथील तुळशी धरणग्रस्थांचा गेल्या सत्तेचाळीस वर्षाचा त्यांच्या राहत्या घराचा सातबाऱ्याचा प्रश्न आज निकाली निघाला. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन या धरणग्रस्तांना एक दिवसात त्यांच्या जमिनीचे सातबारे करण्याचे आदेश दिले. पण या घटनेला दहा दिवस उलटून गेले तरी संबंधित धरणग्रस्तांना सातबारे उतारे मिळाले नव्हते.

यावरती 'लोकमतने ' बुरंबाळी धरणग्रस्त सातबाराच्या प्रतीक्षेत या मथळ्याखाली काल वृत्त प्रसारित करून प्रशासनाला जागे केले. त्यानंतर काल पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून आजच्या आज सातबारे तयार करा असे सुनावले. रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यानी ऑफिसमध्ये थांबून हे सातबाऱ्याचे काम पूर्ण केले.लोकमतने या ४६ धरणग्रस्तांची गेल्या ४४ वर्षापासूनची रखडलेली मागणी लावून धरत त्यांना त्यांच्या राहत्या घराचे हक्काचे सातबारे मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला. तुळशी धरण बांधणीपासून हे शेतकरी विस्थापित ठिकाणावर वास्तव्यास आहेत. त्यांचा हा हक्काच्या सातबाराच्या लढा गेली कित्येक वर्ष चौकशीच्या प्रक्रियेत अडकला होता. या फाईलवरती गेल्या कित्येक दिवसांपासून त्रुटी निघत होत्या. दहा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यानी अचानक बुरंबाळी गावाला भेट दिली व या धरणग्रस्तांच्या मागण्या जाणून घेतल्या.तेथूनच सातबारे अपडेट करण्याच्या सूचना प्रशासनाला देऊन एकच दिवसात सातबारे तयार करण्याची सूचना केली. पण दहा दिवस लोटले तरी सातबारे तयार न झाल्याने लोकमतने यावर प्रकाशझोत टाकत सातबाऱ्यासाठी धरणग्रस्तांची प्रतीक्षा या आशियाचे वृत्त प्रसारित केले व पुन्हा एकदा प्रशासनाने या सातबाराच्या कामात गती घेतली.

संध्याकाळपर्यंत सातबारे अद्यावत करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबूनच हे सातबारे पूर्ण केले. रात्री उशिरा ही बातमी बोंबाळे ग्रामस्थांना समजताच त्यांनी आपला इतक्या वर्षाचा प्रश्न निकाली निघाल्याच्या आनंदात फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.

गेल्या चव्वेचाळीस वर्षांपासून आम्ही हक्काच्या घरासाठी जो संघर्ष करत होतो, त्याला आज पूर्णविराम मिळाला. प्रशासनामुळेच आम्हाला हक्काचे सातबारे मिळाले याचा खूप मोठा आनंद आहे .- के .डी. इंगवले, अध्यक्ष, ज्योतिर्लिंग तुळशी धरणग्रस्त संघटना

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूरDamधरण