शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

कोल्हापूर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ४८ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:19 AM

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेचा राज्यभर बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असले तरी कोल्हापुरात थोडी बरी परिस्थिती आहे. मुळातच मध्यम, ...

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेचा राज्यभर बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असले तरी कोल्हापुरात थोडी बरी परिस्थिती आहे. मुळातच मध्यम, मोठ्या धरणांमुळे पाणीदार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १०७ गावांतून ४८ कोटी ७८ लाखांची १८५९ कामे पूर्णत्वास गेली आहेत. यात शासकीय व लोकसहभागातून गाळ काढणे, शेततळे, समतल चर, आदी कामे प्राधान्याने झाल्याने सुमारे १५ हजार टी. सी. एम. (थाऊजंड क्युबिक मीटर) पाणीसाठा नव्याने झाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात काळम्मावाडी, राधानगरी, वारणा, तुळशी या मोठ्या प्रकल्पांसह आणखी १४ मध्यम प्रकल्पांतून पाण्याची साठवणूक होते. मुळातच जिल्हा जलयुक्त असल्याने येथे जलयुक्त शिवार योजनेची फारशी गरज नव्हती; पण जिल्ह्यातील विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे अतिपाऊस पडणाºया क्षेत्रांमध्ये जमिनी पाणथळ बनतात तर अतिशय कमी पाऊस असलेल्या ठिकाणी पिके पाण्यासाठी ओढ धरतात. मुळातच कोल्हापूर जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. परंपरागत पाणी साठविण्याची आणि ते शेतीसह अन्य कामाला वापरण्याची सोय आहे; पण काळानुरूप त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हे तलाव गाळाने भरून गेल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाल्याने पावसाळ्यात ओसंडून वाहणारे तलाव उन्हाळ्याच्या तोंडावर कोरडे पडतात.या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाने राज्य शासनाच्या वतीने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्याचा सहभाग नोंदविला. २०१५ ते २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत १०७ गावांनी यात सहभाग घेतला. या गावांतील सर्वेक्षणानुसार ११८८ कामांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली. त्यासाठी ६० कोटी ८३ लाखांची रक्कमही मंजूर करण्यात आली. या मंजूर कामांपैकी १८५९ कामे आजअखेर पूर्णत्वास गेली आहेत. यावर ४८ कोटी ७८ लाखांचा खर्चही करण्यात आला आहे. या कामामुळे जिथे पाऊस कमी पडतो अशा जिल्ह्यातील तालुक्यात नव्याने पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे.वर्ष गावे मंजूर पूर्ण खर्च पाणीसाठा कामे कामे (लाखांत) (टी.सी.एम.)२०१५-१६ ६९ १२१२ १२१२ ३०३८.१० ७१५.४७२०१६-१७ २० ४६१ ४६१ १७.०७.९२ ९१६९.९८२०१७-२०१८ १८ २१५ १८६ १३२.२८ ४२८६.८२सन २०१८-१९ साठी या योजनेकरिता ७२ गावांची निवड झाली असून तेथे १० कोटी ५६ लाख खर्चाची ६१२ कामे मंजूर करण्यात आली आहेत. पावसाळा सुरू असल्याने ही कामे सुरू होऊ शकली नव्हती. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नव्या कामांना सुरुवात होणार आहे.