शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Kolhapur: करवीर पंचायत समिती पतसंस्थेत ५ कोटींचा ढपला; जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 17:38 IST

मृत सचिवाकडून वसुलीसाठी संस्थेकडून प्रयत्न

कोल्हापूर : करवीर पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेत ५ कोटी ३१ लाख २४ हजार रुपयांचा ढपला पाडल्याची तक्रार पतसंस्थेच्या ४८ ठेवीदारांनी मंगळवारी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. संस्थेचे मृत सचिव पी. ए. परिट यांनी हा ढपला पाडल्याचे संस्थेच्या अध्यक्षासह संचालकांचे म्हणणे आहे, परंतु परिट गैरव्यवहार करत असताना, अध्यक्षासह संचालकांना काहीच कसे लक्षात आले नाही, अशी विचारणा ठेवीदारांनी केली आहे. संस्थेचे अंतर्गत लेखापरीक्षक बी. एस. पाटील यांनी २०२३-२४ सालचे लेखापरीक्षण केले आहे. त्यांनीही अपहार झाल्याचे मान्य केले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.ठेवीदार सुबराव पवार, आप्पासाहेब नुल्ले, गणेश शेलार, सुरेखा पवार, शहिदा हेरवाडे, प्रकाश घबाडे आदींनी त्यांची किती रकमेची फसवणूक झाली, त्या रकमेसह ही तक्रार केल्याने ही बाब गंभीर आहे. निवृत्त मुख्याध्यापक कृष्णा बाबाजी वरेकर यांनी निवृत्तीनंतर मिळालेले पैसे, तसेच गावाकडील जमीन विकून मिळालेले पैसे सुमारे ६० लाख रुपये या संस्थेत ठेवले होते. ही रक्कम परत मिळेना या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे.ठेवीदार जानेवारी २०२४ पासून ठेवीची मागणी करत आहेत, परंतु एकाही ठेवीदारास ते पैसे देऊ शकलेले नाहीत. त्यावरून संभ्रमाचे वातावरण तयार झाल्यावर संस्थेच्या अध्यक्षांनी, संचालक व मानद सचिव यांची एकत्रित बैठक घेतली. त्यामध्ये ठेवीदारांनी एकूण १३ कोटी ठेवींपैकी अडीच कोटी कर्ज वजा जाता उर्वरित १० कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी कुठे आहेत, अशी विचारणा केल्यावर त्यांना काहीच सांगता आले नाही. संस्थेच्या चालू खात्यावर सध्या फक्त पाच-सहा लाख रुपयेच असल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे.

स्थावर मालमत्ताच नाही..

या पतसंस्थेने १५० ठेवीदारांच्या सुमारे १३ कोटींच्या ठेवी स्वीकारल्या आहेत. या संस्थेची स्थावर मालमत्ता काहीही नाही. संस्थेचा आर्थिक व्यवहार फक्त ठेवींवरच सुरू होता. कॅश क्रेडिट नाही. संस्थेची आर्थिक उलाढाल करण्याची क्षमता अडीच ते तीन कोटी रुपयांचीच आहे. असे असतानाही संस्थेने गरजेपेक्षा जास्त ठेवी स्वीकारून संगनमताने खोटे वार्षिक अहवाल तयार करून गैरव्यवहार केल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे.

एकाही ठेवीदारास ठेव मिळेना..संस्थेचे सचिव एम. ए. देसाई यांनी आमची चूक झाली, जी काय शिक्षा होईल, ती आम्ही भोगावयास तयार आहे, अशी कबुली ठेवीदारांसमक्ष दिली होती. सर्व ठेवीदारांची रकम संस्थेचे मयत सचिव पी. ए. परिट यांच्या मालमत्तेतून तत्काळ वसूल करून आणि सर्व संचालक मंडळ मिळून रक्कम भरून ठेवी परत करण्याची व्यवस्था करत आहे, असे आश्वासन दिल्यामुळे आजपर्यंत आम्ही ठेवीदार संयमाने राहिलो, परंतु आजअखेर एकाही ठेवीदाराला रक्कम परत मिळाली नसल्याने आम्ही तक्रार केल्याचे ठेवीदारांनी सांगितले. संस्थेने मयत सचिव परिट यांच्या व त्यांच्या वारसांविरुद्ध सहकार न्यायालय क्रमांक १ मध्ये मनाई दावा दाखल केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर