शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

महिलांमध्ये ५ तर पुरुषाच्या शरीरात ६ लिटरपर्यंत रक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:29 AM

कोल्हापूर : सर्वसाधारणपणे महिलांच्या शरीरात ४ ते ५ तर पुरुषांच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. पण वैद्यकीय ...

कोल्हापूर : सर्वसाधारणपणे महिलांच्या शरीरात ४ ते ५ तर पुरुषांच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. पण वैद्यकीय शास्त्रामध्ये रक्त लिटरमध्ये मोजण्याऐवजी किती हिमोग्लोबीन आहे, याचे मोजमाप केले जाते. हिमोग्लोबीनच्या प्रमाणावरून संंबंधित निरोगी आहे की नाही, यासंबंधीचा प्राथमिक निष्कर्ष काढला जातो. निरोगी असलेल्यांनी रक्तदान केल्यानंतर त्यांच्या शरीरात काहीही फरक पडत नाही. पण रक्तदानानंतर दोन दिवस भरपूर पाणी प्यावे लागते, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.

लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ या नावाने विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. यानिमित्त रक्तासंबंधी विविध प्रश्न कुतूहलाने विचारले जात आहेत. रक्त सर्वांच्या शरीरात असते, पण त्या व्यक्तीलाही माहीत नसते की आपल्या शरीरात किती रक्त आहे. निरोगी पुरुषाच्या शरीरात ४ ते ५ लिटर रक्त असते. पुरुषांच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. पुरुषांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण १३ ते १६ ग्रॅम टक्के आणि स्त्रियांमध्ये १२ ते १४ ग्रॅम टक्के असते. इतके हिमोग्लोबीनचे प्रमाण असलेले रक्तदानासाठी आल्यानंतर एकावेळी केवळ ३५० मिलिमीटरच रक्त घेतले जाते. एका पिशवीतील रक्तातून तांबड्या पेशी, प्लाझ्मा, प्लेटलेटस, शीत अपक्षेप असे घटक वेगळे काढता येतात. गरजेनुसार यातील घटक ॲनेमिया, मलेरिया, डेंग्यू, हिमोफिलिया आणि अतिरक्तस्राव झालेल्यांना दिले जाते.

चौकट

रक्त कमी झाल्यावर कोणते आजार ?

रक्त कमी झाल्यानंतर ॲनेमिया, थॅलेसेमिया, हिमोफिलिया असे आजार होतात. अपघातामध्ये आणि महिलांमध्ये मासिकपाळी दरम्यान अति रक्तस्राव झाल्यामुळे अशक्तपणा येतो.

रक्त कमी होण्याची कारणे

सकस आहार न घेणे, आहारात पालेभाज्या कमी असणे, आयर्नयुक्त पदार्थ कमी खाण्यामुळे रक्त कमी होते. रक्तवाढीसाठी अधिकाधिक पालेभाज्या असलेले भोजन करायला हवे. मोड आलेले कडधान्य, गुळाची चिक्की खाल्ल्यानंतरही रक्तामधील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.

हे रक्तदान करू शकतात

रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाणत साडेबारा टक्यापेक्षा अधिक असलेले, १०० ते १४० रक्तदाब असलेले, वजन ४५ किलोपेक्षा अधिक असलेले, पल्सरेट प्रतिमिनिट ६० ते १०० असलेले रक्तदान करू शकतात.

रक्तदान केल्यानंतरची काळजी

रक्तदान केल्यानंतर दोन दिवस उन्हात कष्टाची कामे करू नये, पाणी भरपूर प्यावे, सकस आहार घ्यावा, चांगली झोप घ्यावी, धूम्रपान आणि दारू पिऊ नये, लांबचा प्रवास टाळावे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

कोट

महिलांच्या शरीरात ४ ते ५ आणि पुरुषांच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. एका रक्ताच्या बॅगेतून विविध घटक वेगळे केल्यानंतर गरजेनुसार चार रुग्णांना वापरता येते.

डॉ. शिल्पा नारायणकर, रक्तपेढी प्रमुख, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय विभागीय रक्तपेढी