शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

खासगी, जंगल क्षेत्रातील वणव्याचा झालायं वणवाच; जैवविविधता, काजू-आंब्याच्या बागा होरपळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 13:49 IST

काजू व आंब्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्ने उध्वस्त

सदाशिव मोरेआजरा : आजरा परिसरात होळीच्या पार्श्वभूमीवर खासगी जमिनीसह जंगल परिसरात लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता नष्ट झाली आहे. वणव्यात हजारो  स्थानिक प्रजातीच्या झाडांसह काजू व आंब्याच्या बागा होरपळल्या आहेत. वाढल्यामुळे काजू व आंब्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्ने जमीनदोस्त झाली आहेत.गेल्या आठ दिवसापासून आजरा तालुक्यात सुरू असलेला वणवा अद्याप संपलेला नाही. दररोज खाजगी जमिनीसह जंगल क्षेत्राला आग लागलेलीच आहे. दुपारच्या वेळात लागलेली आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांसह वन कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. मात्र उन्हाचा तडाका व जोरदार वाऱ्यामुळे क्षणात आग सर्वत्र पसरत आहे. आगीचे लोट ३० ते ३५  फूट उंचीवर जात आहेत. त्यामुळे आग विझवण्यातही अडचणी येत आहे.वणव्यामुळे सरपटणारे प्राणी, लहानपक्षी व त्यांची घरटी जळून जात आहेत. निसर्ग सौंदर्याने नटलेला व मुबलक जैवविविधता असलेल्या आजऱ्यातील जैवविविधता नष्ट होत आहे. वन विभागाच्यावतीने जंगलांना आग लागू नये म्हणून जाळ रेषा काढली आहे मात्र या जाळ रेषेच्या आतमध्येही जंगलांना आग लागली आहे. सोहळे, वझरे, मडिलगे, सुलगाव, चांदेवाडी, लाटगांव, चित्री धरण परिसरात जंगलांसह खासगी क्षेत्रात लागलेला वणवा आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. गेल्या आठ दिवसापासून होळीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सर्वत्रच वणवे लागल्यामुळे शेतकऱ्यांसह वन विभागाला या वणव्यांचा वणवा झाला आहे.

वणव्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नसर्वत्र वणवे लागल्यामुळे जनावरांचे गवत व पिंजर जळून खाक झाले आहे. वर्षभरासाठी लागणारे गवत व पिंजर साठवून ठेवलेले आहे. मात्र गवतालाच वणवे लागल्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

पिकांच्या उत्पन्नावर पाहिलेली स्वप्ने उध्वस्तकाजू व आंब्याच्या बागांना पोषक वातावरणामुळे चांगला मोहोर आला होता. मात्र वणव्यामुळे अनेक ठिकाणच्या काजू व आंब्याच्या बागा जळाल्या आहेत. त्यामुळे काजू व आंब्याच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी पाहिलेली स्वप्ने चालू वर्षी उध्वस्त झाली आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforestजंगलfireआग