शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Kolhapur- सहापदरी महामार्गाचा विचका : धोकादायक खोदकाम, खड्डे, अपूर्ण काम; सूचना फलकांचा अभाव

By संदीप आडनाईक | Published: June 19, 2024 12:29 PM

सातारा-कोल्हापूर-कागल या राज्यमार्ग क्रमांक ४ च्या सहापदरीकरणाचे काम सुरू 

संदीप आडनाईककोल्हापूर : रोज किमान ९० हजार वाहनांची वर्दळ असणाऱ्या स्वप्निल स्वर्णिम चतुर्भुज परियोजनेतील सातारा-कोल्हापूर-कागल या राज्यमार्ग क्रमांक ४ च्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु, ठिकठिकाणी धोकादायक खोदकाम, महामार्गाला लागून असलेले खड्डे, बाजूपट्ट्यांवरचे अपूर्ण काम, वळण रस्ते, उपमार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यांना नसलेले फलक, सांडपाणी तसेच पावसाचे साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी, उघड्या सळ्या यामुळे अपघाताला निमंत्रण देणारा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा हा प्रकल्प म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा ठरत आहे.कर्नाटकच्या हद्दीतील कागल तालुक्यातील कोगनोळी गावापासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील घुणकी येथील वारणा नदीवरच्या पुलापर्यंतच्या या पुणे ते बंगळुरू या राष्ट्रीय (जुना नंबर-एन.एच.४) महामार्गावरील कामाची पाहणी लोकमतच्या प्रतिनिधीने सोमवारी केली. ४५ किलोमीटरच्या या प्रवासासाठी पाऊण तास लागण्याची अपेक्षा असताना दीड तास लागला. या प्रवासात वाहनधारकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते याची प्रचिती आली. सहापदरीकरणाचे बंगळुरूपासून कागलपर्यंतचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. परंतु, कागलपासून वारणा नदीवरील पुलापर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी कचऱ्याचे आणि सांडपाण्याचे साम्राज्य आहे. तेथे शेवाळ निर्माण झाल्याने दुर्गंधी येते ती वेगळीच.काम पूर्ण तरी मध्यभागी दाेन फूट उंचवटेउजळाईवाडी जवळ बाजूपट्ट्याचे समतलीकरण सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता पूर्ण आहे, मात्र उंचवट्यामुळे दोन भाग झाले आहेत. तेथील दोन फूट उंच उंचवटा तसाच आहे. संपूर्ण महामार्गावर सुमारे १३ ते १४ ठिकाणी वळण रस्ते आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर धोकादायक पद्धतीने चुकीच्या दिशेने वाहनांना जावे लागते. गोकूळ शिरगावच्या रस्त्यावर पाइपलाइनचे तोंड उघडेच आहे. पाणी साठल्यास येथे उतार समजून येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. लक्ष्मी टेकडीजवळ पाइपलाइनवर धोकादायक पद्धतीने सळया दिसतात.फलकांचा अभाव...अनेक ठिकाणी जेसीबीने दगड फोडण्याचे काम सुरू आहे. तेथे फलकच नाहीत. तावडे हॉटेल परिसरात कोल्हापूरकडे वळण्यासाठीही फलक नाही, त्यामुळे बाहेरचे प्रवासी गोंधळून जातात. तावडे हॉटेलपासून सांगली फाट्याजवळ महामार्गावर ठळक अक्षरात वळण रस्त्याचा फलक नाही. सांगलीकडे वळायचे त्या पुलाखाली अवैध वाहतूक करणारी वाहने थांबून आहेत. शिरोली एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बोगदा तर अस्वच्छतेचे आगार बनलेले आहे. बोगद्यात ठिकठिकाणी माती आणि दगडांचे खच पडलेले आहेत.

समतलीकरण न केल्याने उंचवटे अपघाताला कारणीभूतसादळे-मादळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील वळण रस्ता धोकादायक आहे. येथे अनेक वाहने चुकीच्या दिशेने येतात. मंगरायाचीवाडी येथील वळण रस्त्याच्या बाजूला जोडलेल्या दोन रस्त्यांच्या मध्यभागातील चरी बुजविलेल्याच नाहीत. अनेक ठिकाणांचे समतलीकरण न केल्याने उंचवटे अपघाताला कारणीभूत ठरतात. एकूण वाहनधारकांना या मार्गावर सुलभ प्रवास करता येत नाही.अनेक ठिकाणी वाहतूक पोलिसांची अडवणूकमहामार्गावर बाहेरून येणाऱ्या तसेच जिल्ह्यातील प्रवाशांच्या वाहनांना वाहतूक पोलिस अडवणूक करताना आढळले. कागलच्या लक्ष्मी टेकडी परिसरात तसेच टोपजवळ या पोलिसांमुळेच वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग