शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Kolhapur: अपघात, आत्महत्या, पलायन थांबेना; गत तीन वर्षातील आकडे चिंताजनक

By उद्धव गोडसे | Updated: January 6, 2025 14:09 IST

मुली पळून जाण्याने उसवली कुटुंबांची वीण

उद्धव गोडसेकोल्हापूर : गेल्या आठ-दहा वर्षांपासून अपघाती मृत्यूंची संख्या सातत्याने वाढत आहे. यासोबतच आत्महत्या आणि अल्पवयीन मुली घर सोडून पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १,२०७ अपघाती मृत्यू झाले. ७६७ मुली घर सोडून पळाल्या, तर ४ हजार ७६७ जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. या तिन्ही समस्या गंभीर बनत आहेत. त्यामुळे हे रोखण्याचे आव्हान समाजासह सर्वच शासकीय यंत्रणांसमोर निर्माण झाले आहे.

तीन वर्षांत १,२०७ अपघाती मृत्यूवाहतूक गतिमान आणि सुरक्षित व्हावी, यासाठी रस्ते प्रशस्त केले जात आहेत. मात्र, रस्ते कामातील त्रुटी आणि वाहनधारकांच्या बेशिस्तीमुळे सुरक्षेचा मुद्दा बाजूला पडल्याचे दिसत आहे. किरकोळ आणि गंभीर अशा सर्वच प्रकारच्या अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यातून दरवर्षी हजारो लोकांना अपंगत्व येते. तीन वर्षात १,२०७ जणांनी आपले प्राण गमावल्याने सबंधितांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले.विशेष म्हणजे अनेक वाहनधारक विमा संरक्षण घेत नाहीत. त्यामुळे अपघातानंतर मृतांच्या नातेवाइकांना योग्य नुकसानभरपाई मिळत नाही. जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांची परवड होते. हे टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांनी ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघातांची संख्या कमी होऊ शकते.आत्महत्येची समस्या गंभीरशालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत विविध वयोगटातील व्यक्ती क्षुल्लक कारणातून आत्महत्या करीत जगणे संपवत आहेत. विशेष म्हणजे यात तरुणांची संख्या लक्षणीय असल्याने चिंता वाढली आहे. अपयश, बेरोजगारी, आर्थिक चणचण, वाढते मानसिक ताणतणाव, कौटुंबीक वादातून आत्महत्या होत आहेत. आजाराला कंटाळून आत्महत्या करण्याचेही प्रमाण वाढत आहे.ही समस्या अतिशय गंभीर असूनही काही अपवाद वगळता पोलिस दप्तरी याची नोंद आकस्मिक मृत्यू अशी होते. त्यामुळे आत्महत्यांची नेमकी आकडेवारी समोर येत नाही. गळफास, बुडून मयत, तणनाशक प्राशन केल्यानंतर होणारे मृत्यू, पेटवून घेतल्यानंतर होणाऱ्या मृत्यूंच्या नोंदी आत्महत्या म्हणूनच होणे आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षात आकस्मिक मृत्यू आणि आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ४ हजार ७६७ एवढी आहे.

७६७ अल्पवयीन मुली पळाल्यागेल्यी तीन वर्षात जिल्ह्यातून ७६७ अल्पवयीन मुली पळाल्या. यातील ७१५ मुली सापडल्या असून, ५२ मुलींचा शोध सुरूच आहे. सोशल मीडियाचा गैरवापर, शारीरिक आकर्षण, प्रेमाचे आमिष, कुटुंबातील हरवलेला संवाद आणि स्वातंत्र्याचा गैरफायदा घेण्याच्या वृत्तीमुळे अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.ही समस्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम करते. समाजातील बदनामीमुळे कुटुंबाला मानसिक धक्का बसतो. घरातील इतर मुलींचे लग्न होण्यास अडचणी येतात. मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सुटते. कुटुंबात विसंवाद वाढतो. मुलगा आणि मुलीच्या कुटुंबात वाद होतात. या समस्येवर वेळीच उपाय करण्याची गरज आहे, अन्यथा याचे परिणाम आणखी गंभीर होण्याचा धोका आहे.हे आकडे चिंताजनक

प्रकार - २०२४ - २०२३ - २०२२ - एकूण

  • आत्महत्या - १,६१० - १,५१३ - १,६४४ - ४,७६७
  • अपघात - ३६३ - ४१२ - ४३२ - १,२०७
  • मुली पळून जाणे - २६७ - २४० - २६० - ७६७
टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस