शहरं
Join us  
Trending Stories
1
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
2
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
3
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
4
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
6
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
7
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
8
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
9
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
10
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
11
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
12
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
14
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
16
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
17
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
18
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
19
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
20
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 

पुराचा सामना करावा लागू नये यासाठी कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:25 AM

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांना यापुढे पुराला सामोरे जावे लागू नये, यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उपाययोजना राबविण्यासाठीचा ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांना यापुढे पुराला सामोरे जावे लागू नये, यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उपाययोजना राबविण्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिली. करवीर तालुक्यातील वळीवडे, चिंचवाड, वसगडे या पूरबाधित गावांच्या पाहणी दरम्यान त्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या.

मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली. वळीवडे येथील ऊसशेतीच्या नुकसानीची पाहणी ट्रॅक्टरमधून केली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शितल मुळे-भामरे, गटविकास अधिकारी जयवंत उगले, पंचायत समिती सभापती मंगल पाटील, गावचे सरपंच, ग्रामसेवक, पूरबाधित नागरिक उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी वळीवडे, चिंचवाड भागातून रेल्वे मार्ग जात असून याखालील भरावामुळे नदीचे पाणी अडवले जाऊन हे पाणी शेतात पसरते. त्यामुळे रेल्वे मार्ग उंचावर करून कमानी कराव्यात, त्यामुळे प्रवाहाला अडथळा होणार नाही. पंचगंगा नदी व ओढ्यावरील पुलाखालील भराव काढून कमानी कराव्यात, अतिक्रमणे काढावीत अशी मागणी केली.

यावेळी मंत्री पाटील यांनी पुरामुळे करवीर व हातकणंगले तालुक्यातील नागरिकांचे व शेतीचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याबाबत रेल्वे विभागासह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांना नुकसानीचे सरसकट पंचनामे करा. पंचनामे जलदगतीने करा, जेणेकरून मदत वेळेत पोहोचविता येईल. पूरबाधित कोणताही नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये, याची दक्षता घ्या, अशा सूचना केल्या.

----

वळीवडेत ३५० हेक्टरचे नुकसान

वळीवडे गावातील सुमारे ३५० हेक्टर तर चिंचवाडमधील ३२५ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले असून पंचनामे लवकरच पूर्ण होतील, असे तहसीलदार शितल मुळे यांनी सांगितले.

---

रुई-इंगळी बंधाऱ्याची पाहणी

करवीरनंतर मंत्री पाटील यांनी रुई-इंगळी बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरबाधितांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे. रुई-इंगळी बंधाऱ्याबरोबरच नदी, ओढ्यावरील भरावामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी उपाययोजना करणे, ओढ्यावरील व नदीपात्रातील अतिक्रमणे काढणे, गाळ काढणे, गावांचे पुनर्वसन करणे, पूररेषा निश्चित करून नद्यांचे रुंदीकरण या उपाययोजना करणे आवश्यक असून याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, मुरलीधर जाधव, तहसीलदार शरद पाटील उपस्थित होते.

---

फोटो नं १४०८२०२१-कोल-सतेज पाटील पाहणी०१

ओळ : कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी करवीर तालुक्यातील वळीवडे, चिंचवाड, वसगडे या पूरबाधित गावांची पाहणी केली.

---

०२ यावेळी त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

---