शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

जलपर्णी हटविण्यात प्रशासन नापास

By admin | Published: June 23, 2015 11:27 PM

समस्या बिकट : नदीला पूर आल्यानंतरच जलपर्णी वाहून जाणार

कुरुंदवाड : पंचगंगा नदीत पाणी प्रदूषणाबरोबरच जलपर्णीचीही समस्या गंभीर आहे. जलपर्णी हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून फारसे प्रयत्नही केले जात नाहीत. त्यामुळे ही समस्या बिकट होत असून, पुराच्या काळात जलपर्णी वाहून गेल्यावरच नदीला मुक्ती मिळते. त्यामुळे जलपर्णी वाहून जाण्यासाठी पंचगंगा नदीकाठावरील नागरिक पुराच्या प्रतीक्षेत आहेत.पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला सोसावा लागत आहे. मात्र, या नदी प्रदूषणाबरोबर जलपर्णीची समस्याही तितकीच गंभीर आहे. पंचगंगा नदीवर तेरवाड व शिरोळ हे शेवटचे बंधारे आहेत. जलपर्णी या बंधाऱ्याला तटल्याने संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने व्यापते. ऐन उन्हाळ्यातच ही समस्या निर्माण होते. जलपर्णीची समस्या गंभीर बनल्यानंतरच जिल्हा प्रशासन ते हटविण्यासंदर्भात नियोजन करते. मात्र, चार ते पाच फूट उंचीचा थर निर्माण होत असल्याने जलपर्णी पूर्ण हटविणे जिकिरीचे बनते. अखेर महापुरातूनच जलपर्णी वाहून जाते. निसर्गाने निर्माण केलेले संकट निसर्गच मुक्त करतो. त्यामुळे जलपर्णी वाहून जाण्यासाठी पंचगंगा नदीकाठचे नागरिक व शेतकरी पुराच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या पावसाला सुरुवात झाल्यामुळे पंचगंगा तुडुंब भरून वाहत आहे. नदीवरील पूल, बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्यानंतरच जलपर्णी वाहून जाते. पाण्यामुळे जलपर्णी पात्रातून वर येत असून, लवकरच पंचगंगा नदी जलपर्णीमुक्तहोण्याची शक्यता आहे. जलपर्णीमुळे आॅक्सिजनचे प्रमाण घटतेहवेतील आॅक्सिजन पाण्यात विरघळल्यावरच जलचरांना श्वास घेणे शक्य आहे. मात्र, नदीपात्र जलपर्णीने व्यापल्याने, तसेच प्रदषणामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मासे मृत पावण्याच्या घटना घडत असतात.