शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

वडिलानंतर मुलगाही आमदार.. कोल्हापूरकरांनी सहाजणांचे निवडले वारसदार

By पोपट केशव पवार | Updated: October 23, 2024 16:06 IST

कर्तृत्व पाहूनच लोकांनी दिली संधी

पोपट पवारकोल्हापूर : राजकारणात एकाच घराण्याला जनता कधी स्वीकारते, तर अनेकदा ती स्वीकारत नाही, असे चित्र गेल्या साठ वर्षांत राज्यातील अनेक मतदारसंघांत दिसून आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात मात्र एकाच घरात वडील व मुलालाही आमदारकीचा गुलाल अनेक मतदारसंघांनी लावला आहे. जिल्ह्यातील बाप-लेकांच्या सहा जोड्यांना आमदारकी मिळाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, आनंदराव देसाई, बाबासाहेब पाटील-सरुडकर, जयवंतराव आवळे व नरसिंग गुरुनाथ पाटील यांच्यानंतर त्यांच्या मुलांनाही जनतेने स्वीकारल्याचे दिसते.सरुडकर पिता-पुत्रांना दिली संधीशाहूवाडी मतदारसंघातून बाबसाहेब पाटील सरुडकर हे १९८० व १९९० असे दोन वेळा आमदार होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र सत्यजित यांना येथील जनतेने २००४ व २०१४ मध्ये विधानसभेत जाण्याची संधी दिली.डी. वाय. पाटील यांच्यानंतर सतेज पाटीलही विधानसभेतपन्हाळा मतदारसंघातून डॉ. डी. वाय. पाटील हे १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झाले होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र सतेज पाटील यांनी २००४ मध्ये करवीरमधून अपक्ष उमेदवारी करत बाजी मारली. पुढे २००९ मध्ये कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसकडून त्यांनी विजय मिळवला.हातकणंगलेत आवळे बापलेकांची किमयाहातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जयवंतराव आवळे तब्बल पाचवेळा विधानसभेत गेले आहेत. ते राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे पुत्र राजूबाबा आवळे यांनाही लोकांनी २०१९ च्या निवडणुकीत विधानसभेत जाण्याची संधी दिली.चंदगडमध्ये पाटील पिता-पुत्रांना गुलालचंदगडमध्ये १९९० मध्ये काँग्रेसकडून, तर २००४ मध्ये जनसुराज्यकडून नरसिंग गुरुनाथ पाटील विजयी झाले होते. त्यांच्यानंतर पाच टर्मनंतर त्यांचे चिरंजीव राजेश पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधत विजय मिळवला.आवाडे पिता-पुत्र तीन वेळा विधानसभेतजिल्ह्यातील मातब्बर आवाडे कुटुंबातील पिता-पुत्रांना इचलकरंजीकरांनी गुलाल लावला आहे. १९८० मध्ये कल्लाप्पण्णा आवाडे हे या इचलकरंजी मतदारसंघातून निवडून गेले होते. पुढे ते लोकसभेत गेल्याने येथील जनतेने त्यांचे चिरंजीव प्रकाश आवाडे यांना १९८५, १९९५, १९९९, २००४ व २०१९ असे तब्बल पाचवेळा आमदार म्हणून विधानसभेत जाण्याची संधी दिली.देसाई घराण्यात बापलेकांना आमदारकीराधानगरी-भुदरगड मतदारसंघातून आनंदराव देसाई व बजरंग देसाई या बापलेकांना आमदारकी मिळाली आहे. १९६२ च्या पहिल्या निवडणुकीत भुदरगडमधून काँग्रेसकडून आनंदराव देसाई विजयी झाले होते. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव बजरंग देसाई देसाई हे १९८५ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून विधानसभेत गेले.पतीनंतर पत्नी आमदारहातकणंगले मतदारसंघातून निवडून गेलेल्या बाबासाहेब खंजिरे यांच्यानंतर पुढे शिरोळ मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सरोजिनी खंजिरे या १९८५ मध्ये आमदार झाल्या. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात संध्यादेवी कुपेकर, संजयसिंह गायकवाड यांच्यानंतर संजीवनीदेवी गायकवाड, चंद्रकांत जाधव यांच्यानंतर जयश्री जाधव यांना आमदारकी मिळाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण