शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

केंद्राच्या नव्या वीज धोरणाविरोधात आंदाेलनाची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:16 AM

कोल्हापूर : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने वीज कायदा आणण्याचे ठरवल्याने देशभरातील वीज कर्मचारी संतप्त झाले असून खासगीकरणाचा ...

कोल्हापूर : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने वीज कायदा आणण्याचे ठरवल्याने देशभरातील वीज कर्मचारी संतप्त झाले असून खासगीकरणाचा वाव देणारा हा केंद्राचा डाव हाणून पाडण्यासाठी सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्रितपणे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने देखील महावितरणच्या विभाजनाचा प्रयत्न केल्यास संपूर्ण राज्य अंधाराच्या खाईत लोटू असाही इशारा दिला आहे.

महाराष्ट्र राज्य वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात वीज कर्मचारी संघटीतपणे सरकारचा खासगीकरणाचा डाव उधळून लावतील, असे म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकार देशातील ऊर्जा क्षेत्राचा संपूर्ण ताबा खासगी भांडवलदार व त्यांच्या कंपन्यांना देण्यात अगदी उतावीळ झाले आहे. त्यासाठी वीज कायदा २००३ मध्ये संशोधन करून नवीन वीज कायदा २०२१ संसदेत मंजूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या पावसाळी अधिवेशनातच तो पटलावर मांडण्याची तयारीदेखील झाली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने २०१४, २०१८ आणि २०२० अशा तीन वेळा असा प्रयत्न केला होता, पण संघटनेच्या जोरावर वीज कर्मचारी संघटनांनी तो डाव हाणून पाडला होता.

खासगीकरणामुळे कशी लूट होते, याचा अनुभव अनेक राज्यातील जनतेने घेतला आहे. तरीदेखील मोदी सरकार यातून बोध घ्यायला तयार नाही. जनतेपेक्षा उद्योगपतींचे हीत डोळ्यासमोर ठेवून प्रचंड विरोध असतानाही वारंवार हे सुधारणा विधेयक पटलावर येते. त्यामुळे आता खासगीकरण करण्याच्या प्रवृत्तीला रोखण्यासाठी देशभरातील सर्व संघटनांनी वज्रमूठ बांधली असून तीव्र आंदोलनाचीही तयारी केली आहे.

चौकट

विभाजनाने वाढला खर्च व कर्जाचा डोंगर

महाराष्ट्र सरकारने देखील महावितरणच्या विभाजनाचा प्रस्ताव तयार केला आहे. २००५ मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे त्रिभाजन झाले आहे. जनतेचा फायदा होण्याऐवजी खर्चातच जास्त भर पडली असून तोटाही वाढीस लागला आहे. गलेलठ्ठ पगार देऊन नोकरभरती, आलिशान कार्यालये उभारली गेली. यावर कोट्यवधींची उधळण झाल्याने वीज कंपन्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे.

चौकट

तर १९६७ च्या संपाची पुनरावृत्ती

राज्य सरकारच्या वीज कर्मचारी व अभियंते, अधिकारी यांच्या प्रश्नावर घेतलेल्या विरोधी धोरणाचा निषेध म्हणून तत्कालीन विद्युत मंडळाने १९६७ मध्ये संप केला होता. तब्बल ४३ दिवस अख्खा महाराष्ट्रात अंधारात बुडाला होता, त्यावेळी वरिष्ठ अभियंते व अधिकारी कामावर होते तर ९० टक्के कर्मचारी संपावर होते. आता अभियंते, अधिकारी, कर्मचारी सर्वच जण एकत्र आले असून अंधाराची पुनरावृत्ती झाली तर महागात पडेल याकडेही संघटनेने लक्ष वेधले आहे.