शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

कर्मवीर अण्णांच्या गावातच शाळेच्या विकासासाठी आत्मक्लेष आंदोलन

By विश्वास पाटील | Published: August 15, 2023 4:11 PM

...बेजबाबदार मुर्दाड राज्यकर्त्यांच्यामुळे निर्माण झालेली ही घटना कुंभोज ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत क्लेषदायक असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर : स्वत:च्या  पत्नीच्या मंगळसुत्रासह जे काहीं होतं ते विकल व जे काम सरकारला करणे शक्य नव्हत ते कर्मवीर अण्णांनी केल. मात्र सरकारने त्यांना आजही उपेक्षितच ठेवल आहे. ज्या कर्मवीर अण्णांनी सामाजिक जीवनातील शिक्षणाचे धडे कुंभोज (ता.हातकणंगले ) येथील प्राथमिक शाळेतून घेतले त्या शाळेचा समावेश महापुरूषांच्या शाळा विकास यादीमध्ये करण्याचे विसरून गेले. वारंवार निवेदने देवूनही याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने या यादीमध्ये या शाळेचा समावेश व्हावा याकरिता आज  कुंभोज या गावातील लोक स्वातंत्र्यदिनी कर्मवीर अण्णांच्या स्मारकाजवळ आत्मक्लेश उपोषणास बसले आहेत. बेजबाबदार मुर्दाड राज्यकर्त्यांच्यामुळे निर्माण झालेली ही घटना कुंभोज ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत क्लेषदायक असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.माजी खासदार शेट्टी म्हणाले, राज्यातील राज्यकर्त्यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती. ज्या अण्णांनी हे वटवृक्ष  निर्माण केलं त्या वटवृक्षावर आपला  ताबा व वारसा हक्क दाखविण्यासाठी कर्मवीर अण्णांच्या विचाराचा वारसा सांगणा-या या राज्यकर्त्यांनी आपल्याच पै-पाहुणे व नातेवाईकाना  त्याठिकाणी विश्वस्त म्हणून बसविले आहेत. ते अशा वेळेस मुग गिळून गप्प का आहेत..? आज कोल्हापूरात ध्वजारोहणासाठी आलेले  उपमुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजन मंत्री असलेले अजित पवार हे तर रयतच्या उभारणीत काडीचे योगदान नसतानाही ज्या कौशल्याने काकाच्या मदतीने मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य झाले आहेत त्यांनी त्याच कौशल्याने आपली तत्परता या कामात दाखवून कुंभोज ग्रामस्थांना आश्वस्त करून आत्मक्लेश आंदोलनापासून परावृत्त करणे गरजेचे होते. यामुळे राज्यात शिक्षणाची पाळंमुळं ज्या व्यक्तीने रुजवली, ज्या व्यक्तीने गरीबांच्या शिक्षणाची दारं खुलं केली त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गावातील  कुमार विद्या मंदिराचा विकास करण्याकडे दुर्लक्ष केल्यास जन आंदोलन उभे करून सरकारला याबाबत निर्णय घेण्यास भाग पाडू असा इशारा शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSchoolशाळा