शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Agriculture Electricity issue: ऊर्जामंत्र्यांचा दिलासा, कोल्हापूर-सांगलीतील दीड लाख कनेक्शन्सना अभय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 1:27 PM

आर्थिक वर्षअखेर असल्याने महावितरण कंपनीकडून कृषी व अकृषक अशा सर्वच प्रकारांतील चालू वीजबिल थकित असलेल्या लोकांचा वीज पुरवठा बंद करण्याची धडक मोहीम सुरू होती. त्याविरोधात लोकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

कोल्हापूर : चालू बिलाची थकबाकी असलेल्या कृषी पंपांची वीज कनेक्शन्स तीन महिने तोडू नयेत, असे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी घेतल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. या शेतकऱ्यांकडे चालू बिलाची तब्बल ३७० कोटी रुपये थकबाकी आहे.आर्थिक वर्षअखेर असल्याने महावितरण कंपनीकडून कृषी व अकृषक अशा सर्वच प्रकारांतील चालू वीजबिल थकित असलेल्या लोकांचा वीज पुरवठा बंद करण्याची धडक मोहीम सुरू होती. त्याविरोधात लोकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सोमवारी करवीर तालुक्यातील महे ग्रामस्थांनी पाणी योजनेचे वीज कनेक्शन तोडल्याने महावितरण कार्यालयात आंदोलन करून एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. राज्यभरातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड असल्यामुळे पिकांना आठवड्याला पाणी द्यावे लागत आहे.अशातच वीज कनेक्शन तोडल्यास हातात आलेले पीक वाळून जाण्याची भीती होती. या सगळ्याची दखल घेऊन शासनाने कनेक्शन तोडण्याच्या कारवाईस स्थगिती दिली.सध्या विजेच्या चालू बिलासाठी महावितरणची कोणतेही योजना नाही. त्यामुळे त्यांचे प्रबोधन करूनच वीजबिल भरून घ्यावे लागणार आहे. सप्टेंबर २०२० पूर्वीचे वीजबिल थकित असल्यास त्या शेतकऱ्यांसाठी ५० टक्के सवलत आहे. परंतु त्यासही शेतकऱ्यांकडून जेमतेमच प्रतिसाद आहे.

  • कोल्हापूर : १ लाख ४६ हजार कृषी ग्राहकांकडे ३८० कोटी थकबाकी. त्यातील १ लाख ९ हजार कृषी ग्राहकांनी भरले १६७ कोटी ७१ लाख.
  • सांगली : २ लाख ४० हजार कृषी ग्राहक. त्यांच्याकडे १२१९ कोटी रुपयांची थकबाकी. त्यातील १ लाख १५ हजार कृषी ग्राहकांनी भरले १६८ कोटी. 

चालू बिलाची थकबाकी

  • कोल्हापूर : कृषी ग्राहक ३६ हजार : थकित चालू बिल - ९० कोटी
  • सांगली : १ लाख २५ हजार : थकित चालू बिल : २८० कोटी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीज