शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीसांनी टाटांना वाहिली श्रद्धांजली; अखेरच्या निरोपासाठी भलीमोठी रांग
2
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"; राज ठाकरेंचे मोदींना पत्र
3
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
4
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
5
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
6
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
7
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
8
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
9
Riyan Parag ची नौटंकी; अजब-गजब ॲक्शन अन् पंचांकडून थेट कारवाईची रिॲक्शन (VIDEO)
10
Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले
11
कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते
12
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
13
एक लाखाचं बक्षीस… विकत होता भंगार; भारतात परतताच जावेदला दिल्ली विमानतळावर अटक!
14
भयंकर! बायकोला मिळालेल्या योजनेच्या पैशातून नवरा प्यायला दारू अन् उचललं टोकाचं पाऊल
15
"घरातून बाहेर पडताना त्यांनी..."; टाटांची आठवण सांगताना पीयूष गोयल रडू लागले
16
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
17
Ratan Tata News : 'ही' ठरली रतन टाटांची अखेरची डील, मिळवला होता २३,००० टक्क्यांचा नफा; कोणता होता व्यवहार?
18
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
19
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
20
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण

अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य हे कृतिशीलतेचा वस्तुपाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:28 AM

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी मंत्री डांगे यांची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि समकाळ’ या विषयावर विद्यापीठाच्या ...

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी मंत्री डांगे यांची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि समकाळ’ या विषयावर विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या वाहिनीवर विशेष ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.

अहिल्यादेवी सत्ताधारी होत्या, राजकारणी धुरंधर होत्या. मात्र, सत्तेच्या चढाओढीत नव्हत्या. त्यांच्या जहागिरीत धान्याची कोठारे भरलेली असायची. मात्र, सर्व प्रजा जेवल्याची खात्री झाल्याखेरीज त्या स्वतः अन्नग्रहण करीत नसत. त्यांचा खजिना सोन्या-चांदीने भरलेला असला तरी त्यांच्या स्वतःच्या अंगावर मात्र स्फटिकाच्या माळेशिवाय अन्य दागिना नसे. संस्कृती रक्षणासाठी त्यांनी देवळांना संरक्षण पुरविले. काशीहून रोज पाण्याची कावड रामेश्वरपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करताना त्या जोडीनेच त्यांनी टपाल पाठविण्याची व्यवस्थाही विकसित केली. देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार व संरक्षण करण्याचे कार्य त्यांनी केले असल्याचे माजी मंत्री डांगे यांनी सांगितले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी ही मुलाखत घेतली. डॉ. एम.टी. गोफणे यांनी प्रास्ताविक केले.

चौकट

नव्या पिढीने अनुकरणाची गरज

अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत समाजहिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांनी घेतलेले आणि राबविलेले निर्णय अत्यंत मूलगामी, पथदर्शक स्वरूपाचे आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व नव्या पिढीने समजून घेऊन त्यांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.

फोटो (१३०८२०२१-कोल-अण्णासाहेब डांगे (मुलाखत

130821\13kol_4_13082021_5.jpg

फोटो (१३०८२०२१-कोल-अण्णासाहेब डांगे (मुलाखत)