शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
3
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
4
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
5
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
6
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
7
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
8
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
9
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
10
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
11
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
12
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
13
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
14
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
15
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
16
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
17
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
18
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
19
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
20
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...

‘आक्रोश पूरपग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची’ पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:30 AM

कोल्हापूर : महापूरग्रस्तांना भरीव नुकसानभरपाई मिळावी, नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित ५० हजारांचे अनुदान द्यावे, आदी मागणीसंबंधी ...

कोल्हापूर : महापूरग्रस्तांना भरीव नुकसानभरपाई मिळावी, नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित ५० हजारांचे अनुदान द्यावे, आदी मागणीसंबंधी सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पंचगंगा काठावरून भव्य पदयात्रा काढून जलसमाधी घेण्याच्या आंदोलनाची तयारी केली जात आहे. ‘आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची’ या नावाने पदयात्रा १ सप्टेंबरला सुरुवात होईल. गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे शेती आणि इतर मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले आहे; पण भरपाई अतिशय तुटपुंजी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय बदलून भरीव नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा काढून केली आहे. या मोर्चाची दखल घेऊन सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पदयात्रा काढून स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांसह माजी खासदार राजू शेट्टी नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेणार आहेत. त्याची घोषणाही शेट्टी यांनी केली आहे. सरकार मदतीचा निर्णय बदलासंबंधी हालचाल करीत नसल्याचे लक्षात येताच जलसमाधी आंदोलनाची तयारी संघटनेतर्फे केली जात आहे.

महापुराने सर्वाधिक नुकसान होणाऱ्या आणि दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या प्रयाग चिखलीपासून पदयात्रा निघेल. तेथून पदयात्रा आंबेवाडी, वडणगे, निगवे, भुये, शिये, शिरोली, हालोंडी, हेर्ले, चोकाक, रूकडी, चिंचवाड, मुडशिंगी, वसगडे, पट्टणकोडोली, इंगळी, रुई, चंदूर, इचलकरंजी, शिरदवाड, अब्दुललाट, हेरवाड, तेरवाड, कुरुंदवाड या मार्गे पदयात्रा ५ किंवा ६ सप्टेंबरला नृसिंहवाडीत पोहोचेल. तेथे पदाधिकारी व माजी खासदार शेट्टी सामुदायिक जलसमाधी आंदोलन करतील.

कोट

स्वाभिमानीने महापूरग्रस्त आणि नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसंबंधी केलेल्या मागण्यांसंबंधी सरकारने सकारात्मक पावले न उचलल्यास पंचगंगा नदीचा उगम झालेल्या प्रयाग चिखलीपासून १ सप्टेंबरला पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रा पंचगंगा काठावरून येत ५ किंवा ६ सप्टेंबरला नृसिंहवाडीत माझ्यासह पदाधिकारी सामुदायिक जलसमाधी घेतील. त्याची तयारी सुरू केली आहे.

- राजू शेट्टी, माजी खासदार