शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

पन्हाळ्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाकडुन बंद, पर्यटकांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 15:01 IST

ऐतिहासिक पन्हाळ गडावर पर्यटकांची गर्दी ही बारा महिने असतेच. सध्या नाताळ व सलग सुट्टीमुळे पन्हाळगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.

पन्हाळा- ऐतिहासिक पन्हाळ गडावर पर्यटकांची गर्दी ही बारा महिने असतेच. सध्या नाताळ व सलग सुट्टीमुळे पन्हाळगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.मात्र पन्हाळा येथे पुरातत्व विभागाने सज्जाकोठी, तीन दरवाजा, अंधारबाव, धान्याचे कोठार आदी महत्त्वाचे ऐतिहासिक वास्तू बंद केल्याने पर्यटकांना ऐन नाताळच्या सुट्टीतच ही ठिकाणे पाहता येत नसल्यामुळे आलेल्या पर्यटकांची निराशा झाली आहे.

कित्येक पर्यटकांनी यामुळे परतीचा रस्ता धरला आहे. अचानक झालेल्या पुरात्त्वविभागाच्या ऐतिहासिक वास्तू बंद करण्याच्या निर्यणामुळे  मात्र गडावर सर्वत्र निराशा पसरली आहे.

चौथा शनिवार,रविवार त्यातच आज सोमवारी नाताळ सणाची सुट्टी त्यामुळे गडावर या तीन दिवसात सुमारे 70हजार पर्यटकांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या प्रवासी कर व वाहन करात देखील मोठी वाढ झाली आहे.पन्हाळा येथील सर्वच ठिकाणे सलग सुट्टीमुळे गजबजुन गेली आहेत. तर काही परराज्यातील पर्यटकांनी सुट्टीमुळे पन्हाळा येथील हॉटेल्समध्ये मुक्काम ठोकला आहे. मात्र आज सकाळी पुरात्त्वविभागाने कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक  सज्जाकोठी,अंधारबाब,तीन दरवाजा,धान्याचे कोठार आदी ठिकाणे पर्यटकांना पहाण्यास बंद केल्याने पर्यटकांच्यात नाराजी पसरली आहे. अचानक ऐन सु्ट्टीच्या मोसमातच या पुरात्त्वविभागाच्या अधिकारी वियज चव्हाण यांनी ऐतिहासिक वास्तू बंद करण्याचा निर्यण नेमका का घेतला यांचे उत्तर अजूनही समजलेलं नाही. पन्हाळगडावर आज सकाळी झालेल्या या पुरात्त्वविभागाच्या मनमानी कारभारामुळे हैद्राबाद,कर्नाटक,गोवा,गुजरात,मध्यपद्रेश आदी परराज्यातील तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.तर तीन दरवाजा येथुनच तालुक्यातील पश्चिमभागाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे.तीन दरवाजा बंद झाल्याने यामार्गवरील वाहतुक अचनाक बंद करण्यात आली.त्यामुळे वाहनधाकाकांच्यातुन येथील पुरात्त्वविभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता की रस्ता बंद का केला तर कर्मचाऱ्याच्यांकडुन उद्धगिरीची भाषा वापरली जात होती.असे अनेक वाहनधारकांच्यातुन सांगितले आहे.या प्रकारामुळे मात्र पर्यटनावर वपरित परिणाम झाला आहे.पन्हाळगडाला गालबोट लागले आहे.

आम्ही मुंबईवरुन गेल्या तीन दिवासापासून पन्हाळगडावर एका हॉटेलमध्ये राहत आहेत.आज सकाळी तीन दरवाजा येथे गेलो असता तीन दरवाजा बंद करण्यात आल्याने आम्हाला तीन दरवाजा पाहता आले नाही. ऐतिहासिक वास्तुच पहाता आली नसल्याने पुरात्त्वविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी मुंबईहून आलेल्या मंगेश नायर यांनी केली.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर