शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Kolhapur politics: ‘बिद्री’, ‘भोगावती’त वस्त्रहरण; आता लोकसभेला एकीचे तोरण 

By राजाराम लोंढे | Updated: December 7, 2023 13:27 IST

नेत्यांच्या सोयीच्या भूमिका, कार्यकर्त्यांची दुभंगलेली मते जुळणार?

राजाराम लोंढेकोल्हापूर : सहकारात राजकीय पक्षांची मर्यादा नसली तरी ‘बिद्री’, ‘भोगावती’ व होणाऱ्या ‘आजरा’ साखर कारखान्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांचे वस्त्रहरण करणारे नेते येत्या तीन महिन्यांत लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येऊन एकमेकांचे गुणगान गाणार आहेत. हा राजकारणाचा भाग असला तरी लोकसभेला महायुती व महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याच्या आणाभाका काही जणांनी घेतल्या तरी या निवडणुकांमुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांची दुभंगलेली मने जुळणार कशी, हे पाहणे महत्त्वाचे असून कारखान्यांच्या निवडणुकीतील पैरा फेडण्यासाठी एकमेकांना पूरक अशीच भूमिका आगामी घेतली जाणार, हे निश्चित आहे.राज्यातील सत्ता नाट्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), जनसुराज्य पक्ष आदींची महायुतीची मोट अधिक घट्ट झाली. त्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशी महाविकास आघाडी कमकुवत वाटते. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यात ही समीकरणे घडवून आणली. मात्र, नवीन समीकरणानंतरच्या पहिल्याच ‘भोगावती’, ‘बिद्री’ व ‘आजरा’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांनी सोयीची भूमिका घेत घरोबा केला. सहकार संस्थांमध्ये पक्षीय राजकारण नसते, असे जिल्ह्याचे नेते सांगत असले तरी या कारखान्यांच्या निवडणुकीचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटणार आहेत. ‘भोगावती‘ व ‘बिद्री’ कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही आघाड्यांकडून एकमेकांचे वस्त्रहरण केले. ‘महायुती’चे उमेदवार संजय मंडलिक यांच्या विरोधात पालकमंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील होते. महाविकास आघाडीचा संभाव्य उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला तरी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील सांगतील तोच उमेदवार असणार आहे. मात्र, आमदार हे महायुतीच्या नेत्यांसोबत होते. ‘भोगावती’मध्ये महाविकास आघाडीचे नेते आमदार पी. एन. पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे एकत्र होते. विरोधात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची मोट होती. ‘शेकाप’चे उमेदवार तिन्ही पॅनलमध्ये होते. या विचित्र आघाड्यांमुळे कारखान्यांचा सभासद गोंधळलेला होताच; पण त्यानंतर सामान्य मतदार बुचकळ्यात पडला आहे. ‘आजरा’ कारखान्यात आमदार सतेज पाटील व आमदार विनय काेरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, भाजप एकत्र आला आहे. येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधात दंड थोपटले आहेत. खोलवर परिणाम तिन्ही कारखान्यातील विचित्र आघाड्या नेत्यांना सोयीच्या वाटत असल्या तरी त्याचे खोलवर परिणाम होणार आहेत. या भूमिकेचा फटका कोणाला बसणार, हे जरी काळ सांगणार असला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत कोण कोठे जरी असले तरी एकमेकांना पूरक (पडद्याआडून का असेना), अशीच भूमिका दोन्ही आघाड्यातील नेते घेणार, हे निश्चित आहे.

या तालुक्यांतील राजकारण ढवळून निघाले..करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा, कागल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे